शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय यंत्रणांना फक्त ६ अतिरेक्यांना रोखता आले नाही - जैश-ए-मोहम्मदने उडवली खिल्ली

By admin | Updated: January 9, 2016 12:32 IST

भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही अशा शब्दात जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याने खिल्ली उडवली,

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / पठाणकोट, दि. ९ - 'भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही' अशा शब्दात कुख्यात दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने खिल्ली उडवली आहे. या संघटनेतर्फे www.alqalamionline.com या वेबसाईटवर एक ऑडिओ क्लिप अपलोड करण्यात आली असून त्यात पठाणकोट हल्ल्याशी संबंधित गोष्टींबाबत खुलासा करत असून हा हल्ला कसा घडवण्यात आला तेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अझहर याच्या बहावलपूर या शहरातून प्रसिद्ध होणा-या एका उर्दू वृत्तपत्रातही १३ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपबाबत मजकूर छापण्यात आला आहे. 
गेल्या आठवड्यात २ जानेवारी रोजी लष्कराच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर घुसून हल्ला केला. तीन दिवसांच्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले, मात्र त्यात सात जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले. 
या ऑडिओ क्लिपमध्ये सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवण्यात आली आहे तसेच दहशतवाद्यांनी भारतीय रणगाडे, सैन्याच्या गाड्या व हेलिकॉप्टर्सवर कसा हल्ला चढवला हेही नमूद करण्यात आले आहे. 
'पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात?' असा सवाल विचारत मौलाना मसूद अझहरने पाकिस्तानला भारताने दिलेले पुरावे न स्वीकारण्याची धमकी दिली आहे. आमच्या सहा दहशतवाद्यांशीही भारतीय सैन्यातील जवान लढू शकले नाहीत, अशी खिल्ली त्यात उडवण्यात आली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि शूटर फतेह सिंग क्रूरपणे मारल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची टीकाही करण्यात आली आहे. ' ते (जवान) अतिशय वाईट पद्धतीने मारले गेले. भारताने पहिल्यांदा सहा दहशतवादी असल्याचे सांगितले, मग तो आकडा पाच वर गेला आणि नंतर चार दहशतवादी झाले...! एवढा मोठा देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे.  तेथील (भारत) सरकार भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहेत' अशी संतापजनक भाषा ऑडिओत वापरण्यात आली आहे.