शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 07:31 IST

शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना बसची ट्रकला धडक

पाटणा: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात शाळेच्या बसला झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात झाला. विद्यार्थ्यांची बस एका शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील जखमींवर सध्या जमुईमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या मंगरोली गावातील उर्दू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीनिमित्त राजगीरला गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वर अपघात झाला. बसनं रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. बारुण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जमुईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या हे सहा विद्यार्थी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. या अपघातात राजपूरच्या मंगरवालिया येथे राहणाऱ्या मजहरचा (14 वर्षे) मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारSchoolशाळाStudentविद्यार्थी