शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 07:31 IST

शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना बसची ट्रकला धडक

पाटणा: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात शाळेच्या बसला झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात झाला. विद्यार्थ्यांची बस एका शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील जखमींवर सध्या जमुईमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या मंगरोली गावातील उर्दू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीनिमित्त राजगीरला गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वर अपघात झाला. बसनं रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. बारुण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जमुईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या हे सहा विद्यार्थी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. या अपघातात राजपूरच्या मंगरवालिया येथे राहणाऱ्या मजहरचा (14 वर्षे) मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारSchoolशाळाStudentविद्यार्थी