शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:41 IST

जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली

पटणा - देशात एकीकडे व्होटभक्तीचं राजकारण होत आहे तर दुसरीकडे देशभक्ती सुरु आहे. 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण करा, त्यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केलं होतं? जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.  बिहारच्या अररियामध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी लोकांना संबोधित केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीय जवानांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली. मात्र भारतीय जवानांना परवानगी नाकारण्यात आली. कारण काँग्रेसला मतांचे राजकारण करायचं होतं. सर्वांना माहित होतं की, ते दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. मात्र काँग्रेसने पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी हिंदू लोकांना हिंदू दहशतवादी शब्द लावण्याचं षडयंत्र केलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. 

आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, दहशतवाद्यांना मारलं म्हणून काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेतही नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सांगितले की जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर पहिलं चीटफंड घोटाळा आणि घुसखोरी करणाऱ्यांचे पुरावे शोधा. सैनिकांच्या धाडसाचे पुरावे मागणं बंद करा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. 

एवढ्या उन्हातही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित झालात. तुमची तपस्या मी वाया जावू देणार नाही. त्याचा परतावा मी व्याजासह तुम्हाला परत देणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच ज्यांना भारत मातेची अडचण होते असे लोक भारत तेरे तुकडे होंगे नारे लावणाऱ्यांच्या मागे जातात. असे लोक देशाच्या सेवेसाठी कशाला पुढे येणार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत कन्हैयाकुमारवर टीका केली. 

देशभक्तीचं राजकारण काय असतं हे तुम्ही उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर काय होतं हे बघितलं. भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं आणि पाकिस्तानचं तोंड बंद केलं. मात्र दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेस नेते शोक व्यक्त करत आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाararia-pcअररियाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019