शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; उमर अब्दुलांनी फुंकलं रणशिंग, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 2:58 PM

कोर्टाच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सु्प्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयाबद्दल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

जम्मू काश्मिरातील कलम ३७० बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे की, "आमचा अपेक्षाभंग झाला असला तरी आम्ही निराश झालेलो नाहीत. संघर्ष यापुढेही सुरूच राहील. इथपर्यंत पोहोचायला भाजपला अनेक दशकं लागली आहेत. आम्हीही आता दीर्घकालीन लढाईची तयारी केली आहे," असं रणशिंग अब्दुल्ला यांनी फुंकलं आहे.

गुलाम नबी आझाद काय म्हणाले?

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. कलम ३७० हटवणं ही एक चूक होती. जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

दरम्यान, कलम ३७० वर निकाल देताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले की, "जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. निवडणूक आयोगाने नवीन सीमारचनेच्या आधारे विधानसभा निवडणुका घ्याव्यात. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत याठिकाणी विधानसभा निवडणूक घ्यावी. जितकं शक्य असेल तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला," असं कोर्टाने म्हटलं आहे. 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय