शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

शांततेचा दावा करणारे दहशतवाद्यांना आश्रय देत नाहीत, भारताने UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 11:48 AM

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिसातनवर टीका केली.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना संयुक्त राष्ट्रमध्ये भारत प्रथम मिशनचे मिजिटो विनिटो यांनी युएनजीए मध्ये भारताच्या उत्तराच्या अधिकाराचा वापर करत पाकिस्तानवर टीका केली.  

... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी

'या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले हे खेदजनक आहे. आपल्या देशातील गैरकृत्ये लपवण्यासाठी आणि भारताविरुद्धच्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी त्यांनी हे केले आहे, असं मिजिटो विनिटो म्हणाले. 

''एक देश जर शांततेचा दावा करत असेल तर, तो देश कधीही कधीही दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही आणि मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनाही आश्रय देणार नाही. एकाबाजूला शांततेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम आहे, अशी टीका मिजिटो विनिटो यांनी केली.

'' भारतावर खोटे आरोप करण्यापूर्वी आपल्या देशातील पाहिले. जम्मू-काश्मिरवर दावा करण्यापेक्षा दहशतवाद थांबवावा, असंही विनिटो म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर सुरू असलेल्या अत्याचाराची आठवण करुन दिली. 

काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांततेवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानला भारतासह आपल्या शेजारी देशांसोबत शांतता हवी आहे. पण काश्मिर प्रश्नावर हे सर्व अवलंबून आहे, असंही ते म्हणाले होते. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ