शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:01 IST

२०वा हप्ता लवकरच; आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी  

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नवी दिल्ली : शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)च्या २० व्या हप्त्याची वाट पाहत असताना, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २१.८४ लाखांवरून १९ व्या हप्त्यात ९३.२८ लाखापर्यंत लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये वाटप करण्यात आलेला पहिला हप्ता राज्यातील २१.८४ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यात सुमारे ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे देण्यात आले. २०२५ मध्ये १९ व्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या ९३.२८ लाखांपर्यंत वाढली. यात २,०१३ कोटी रुपये वाटप करण्यात आले. म्हणजेच लाभार्थ्यांत चारपट वाढ झाली आणि वितरित निधीमध्ये सुमारे पाचपट वाढ झाली. वाढलेले डिजिटायझेशन, जमिनीची सुधारित नोंद पडताळणी व मोहिमेबद्दलची व्यापक जागरूकता, यामुळे ही वाढ झाली. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण-शहरी अशी स्पष्ट तफावत दिसून येते. 

सर्वाधिक लाभार्थी?सोलापूर, कोल्हापूर व अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. तर ठाणे आणि पालघरसारखे शहरी-केंद्रित भाग खूपच मागे आहेत.

पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे टॉप टेन लाभार्थी जिल्हेजिल्हा    लाभार्थ्यांची     वितरित संख्या                  रक्कम     

सोलापूर              ५,०५,१७२    ११०.२२ अहिल्यानगर       ५,५२,२४६    ११७.२७ कोल्हापूर             ४,८५,२३९    १०८.९६ सातारा                 ४,५३,००७    ९९.८ पुणे                      ४,४६,५४५    ९४.५८ नाशिक                ४,४२,६०६    ९४.०२ जळगाव               ४,०९,५१७    ९०.४४ सांगली                  ४,००,३७४    ८४.२ नांदेड                    ३,८६,२९२    ८०.४२ बीड                      ३,८०,६९९    ८३.४९ एकूण महाराष्ट्र       ९३,२८,२८६    २,०१३.५१पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधारठाणे जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी फक्त ७४,०५१ लाभार्थ्यांची नोंद आहे. पालघरमध्ये आदिवासी व ग्रामीण लोकसंख्या लक्षणीय असूनही १.०१ लाख लाभार्थी नोंदले गेले आहेत. याउलट सोलापूर ५.०५ लाख लाभार्थ्यांसह अव्वल  आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्यात ११० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.आजवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३७,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनला आहे. आता आदिवासी आणि दुर्गम भागांतील शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाMaharashtraमहाराष्ट्र