शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:01 IST

२०वा हप्ता लवकरच; आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी  

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नवी दिल्ली : शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)च्या २० व्या हप्त्याची वाट पाहत असताना, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २१.८४ लाखांवरून १९ व्या हप्त्यात ९३.२८ लाखापर्यंत लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये वाटप करण्यात आलेला पहिला हप्ता राज्यातील २१.८४ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यात सुमारे ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे देण्यात आले. २०२५ मध्ये १९ व्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या ९३.२८ लाखांपर्यंत वाढली. यात २,०१३ कोटी रुपये वाटप करण्यात आले. म्हणजेच लाभार्थ्यांत चारपट वाढ झाली आणि वितरित निधीमध्ये सुमारे पाचपट वाढ झाली. वाढलेले डिजिटायझेशन, जमिनीची सुधारित नोंद पडताळणी व मोहिमेबद्दलची व्यापक जागरूकता, यामुळे ही वाढ झाली. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण-शहरी अशी स्पष्ट तफावत दिसून येते. 

सर्वाधिक लाभार्थी?सोलापूर, कोल्हापूर व अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. तर ठाणे आणि पालघरसारखे शहरी-केंद्रित भाग खूपच मागे आहेत.

पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे टॉप टेन लाभार्थी जिल्हेजिल्हा    लाभार्थ्यांची     वितरित संख्या                  रक्कम     

सोलापूर              ५,०५,१७२    ११०.२२ अहिल्यानगर       ५,५२,२४६    ११७.२७ कोल्हापूर             ४,८५,२३९    १०८.९६ सातारा                 ४,५३,००७    ९९.८ पुणे                      ४,४६,५४५    ९४.५८ नाशिक                ४,४२,६०६    ९४.०२ जळगाव               ४,०९,५१७    ९०.४४ सांगली                  ४,००,३७४    ८४.२ नांदेड                    ३,८६,२९२    ८०.४२ बीड                      ३,८०,६९९    ८३.४९ एकूण महाराष्ट्र       ९३,२८,२८६    २,०१३.५१पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधारठाणे जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी फक्त ७४,०५१ लाभार्थ्यांची नोंद आहे. पालघरमध्ये आदिवासी व ग्रामीण लोकसंख्या लक्षणीय असूनही १.०१ लाख लाभार्थी नोंदले गेले आहेत. याउलट सोलापूर ५.०५ लाख लाभार्थ्यांसह अव्वल  आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्यात ११० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.आजवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३७,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनला आहे. आता आदिवासी आणि दुर्गम भागांतील शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाMaharashtraमहाराष्ट्र