शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 14:54 IST

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपा आमदाराचं भडकाऊ विधान

हैदराबाद : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (एनआरसी) राजकारण तापलं आहे. आसामनंतर पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू करण्याची मागणी भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपानं अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे. एनआरसीवरुन राजकारण ढवळून निघालं असताना आता भाजपाचे हैदराबादमधील आमदार राजा सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अवैध घुसखोर मायदेशात परतले नाहीत, तर त्यांना गोळ्या घाला, असं भाजपा आमदार राजा सिंह म्हणाले आहेत. राजा सिंह हैदराबादमधील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. राजा सिंह यांच्या विधानाआधी बांगलाचे (पश्चिम बंगाल) भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी एनआरसीबद्दल भाष्य केलं होतं. बांगलामध्ये भाजपाची सत्ता आल्यास तिथेही एनआरसी लागू करुन घुसखोरांना हाकलून लावू, असं घोष म्हणाले होते. 'बांगलामध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्यास आहेत. आम्ही यातील एकालाही सोडणार नाही. आता त्यांना अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. जे लोक घुसखोरांचं समर्थन करतात, त्यांनीही त्यांचं सामान बांधावं,' असं घोष म्हणाले. एनआरसीच्या मुद्यावरुन बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी या मुद्यावरुन राजकारण करत असल्याची टीका सुप्रियो यांनी केली. '1971 मध्ये सव्वा कोटी लोकांनी घुसखोरी केली. मात्र ममता बॅनर्जी यांना फक्त त्यांच्या मतपेढीची चिंता आहे. त्यामुळेच त्याला एनआरसीला विरोध करत आहेत,' असं सुप्रियो यांनी म्हटलं.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAssamआसामcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी