शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 14:54 IST

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपा आमदाराचं भडकाऊ विधान

हैदराबाद : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (एनआरसी) राजकारण तापलं आहे. आसामनंतर पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू करण्याची मागणी भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपानं अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे. एनआरसीवरुन राजकारण ढवळून निघालं असताना आता भाजपाचे हैदराबादमधील आमदार राजा सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अवैध घुसखोर मायदेशात परतले नाहीत, तर त्यांना गोळ्या घाला, असं भाजपा आमदार राजा सिंह म्हणाले आहेत. राजा सिंह हैदराबादमधील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. राजा सिंह यांच्या विधानाआधी बांगलाचे (पश्चिम बंगाल) भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी एनआरसीबद्दल भाष्य केलं होतं. बांगलामध्ये भाजपाची सत्ता आल्यास तिथेही एनआरसी लागू करुन घुसखोरांना हाकलून लावू, असं घोष म्हणाले होते. 'बांगलामध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्यास आहेत. आम्ही यातील एकालाही सोडणार नाही. आता त्यांना अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. जे लोक घुसखोरांचं समर्थन करतात, त्यांनीही त्यांचं सामान बांधावं,' असं घोष म्हणाले. एनआरसीच्या मुद्यावरुन बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी या मुद्यावरुन राजकारण करत असल्याची टीका सुप्रियो यांनी केली. '1971 मध्ये सव्वा कोटी लोकांनी घुसखोरी केली. मात्र ममता बॅनर्जी यांना फक्त त्यांच्या मतपेढीची चिंता आहे. त्यामुळेच त्याला एनआरसीला विरोध करत आहेत,' असं सुप्रियो यांनी म्हटलं.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAssamआसामcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी