शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:48 IST

Assam NRC Final Draft :केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाध्यक्षांना तोंडावर पाडलं

नवी दिल्ली: आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन राजकारण प्रचंड तापलं आहे. आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अमित शहांनी या मुद्यावरुन काँग्रेस लक्ष्य केलं. काँग्रेस आसाम करार लागू करण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र आम्ही या कराराची अंमलबजावणी करण्याचं धाडस दाखवलं, असं म्हणत शहांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं होतं. मात्र भाजपा वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. अमित शहांनी आज राज्यसभेत बोलताना 1985 मधील आसाम कराराचा संदर्भ दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार केला. मात्र काँग्रेस पक्ष या कराराची अंमलबजावणी करण्याची हिंमत दाखवू शकला नाही, असं शहा म्हणाले. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसला शहांनी लक्ष्य केलं. 40 लाख घुसखोरांना कोण वाचवू पाहतंय, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला. यानंतर राज्यसभेत काँग्रेस खासदारांनी गोंधळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. अमित शहा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या मुद्यावरुन स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं विधान अगदी उलट आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचं सिंह म्हणाले. 'एनसीआर लागू करण्यामागे सरकारचा कोणताही हात नाही. जे काही सुरू आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरू आहे. त्यामुळे सरकारवरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,' असं राजनाथ सिंह लोकसभेत म्हणाले.  

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा