"पाकिस्तानातून दहशतवादी नव्हे तर मुस्लीम आले अन्..."; ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:03 IST2025-05-30T13:02:54+5:302025-05-30T13:03:50+5:30
पाकिस्तानवर निशाणा साधत प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "पाकिस्तानात सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण...

"पाकिस्तानातून दहशतवादी नव्हे तर मुस्लीम आले अन्..."; ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं मोठं विधान
आपल्या विधानांमुळे सातत्याने वादात राहणाऱ्या भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आता पुन्हा एकदा असेच एक विधान केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केली. या ऑपरेशनसंदर्भात प्रज्ञा ठाकूर यांनी हे विधान केले आहे. "दहशतवाद्यांनी नव्हे, तर पाकिस्तानातून मुस्लीम लोक आले आणि त्यांनी नाव आणि धर्म विचारून हिंंदुंना मारले."
एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "मुस्लिमांनी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. यामुळे ऑपरेशन सिंदूर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. हिंदू धर्मात "सिंदूर" (कुंकू) हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी पहलगाममध्ये महिलांचे कुंकू (सिंदूर) पुसले. यामुळेच याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आल. पाकिस्तान आणि मुस्लिमांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत."
प्रज्ञा ठाकूर पुढे म्हणाल्या, "ही एक अतिशय भयावह आणि हृदयद्रावक घटना आहे. ज्यांनी या हत्या केल्या भारत त्यांना सोडणार नाही. हे लोक जेथे पाळले-पोसले जातात, त्या देशालाही भारत सोडणार नाही."
"पाकिस्तानात सर्वच दहशतवादी" -
पाकिस्तानवर निशाणा साधत प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "पाकिस्तानात सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण ते मुस्लिम म्हणून भारतात आले आणि हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. त्यांनी मुस्लिमांना मारले नाही. ते ठरवून आले होते. जर कुणी मुस्लीम आहे, असं खोटं सांगितलं, तर त्यांना कलमा म्हणायला सांगितलं आणि ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांना मारलं."