शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी...कसे होणार?, शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:16 IST

सरासरीपेक्षा १० टक्के पाणी कमी

नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही देशातील धरणे अद्याप पूर्ण भरलेली नसल्याने चिंता वाढली आहे. केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत २२% कमी आहे. गेल्या दहा वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के इतके कमी आहे.

जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये विक्रमी वाढ झाली होती; मात्र ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाणीच आले नाही. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा स्थितीत येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई जाणवू शकते. ‘अल निनो’चा परिणाम पावसावर दिसून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रब्बी पिकांना धोकापावसाचा तुडवडा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेतकऱ्यांवरील ताण आणखी वाढणहर आहे. धरणे कोरडी पडल्याने अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे संकटही निर्माण होऊ शकते.

१२२ वर्षांत सर्वांत कमी पाऊसयंदा १२२ वर्षांतील सर्वांत कमी पावसाची नोंद ऑगस्टमध्ये झाली आहे. ऑगस्ट महिना ऐतिहासिकदृष्ट्या कोरडा राहिला. या महिन्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा किती? :

ऑगस्ट अखेरीस देशातील १५० धरणांमध्ये ११३.४१७ अब्ज घनमीटर (बीसीएम) होता. गेल्यावर्षी या धरणांमध्ये १४६.८२८ बीसीएम जलसाठा होता. गेल्या १० वर्षांची सरासरी साठा पातळी १२५.११७ बीसीएम आहे.

या राज्यांत धरणे रिकामी

महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू.

उत्तर भाग : हिमाचल, पंजाब, राजस्थानपूर्व क्षेत्र : त्रिपुरा, ओडिशा, झारखंड, प.बंगालपश्चिमी क्षेत्र : गुजरात आणि महाराष्ट्रमध्य क्षेत्र : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडदक्षिण क्षेत्र : आंध्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू

 

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरणIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र