शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी...कसे होणार?, शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:16 IST

सरासरीपेक्षा १० टक्के पाणी कमी

नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही देशातील धरणे अद्याप पूर्ण भरलेली नसल्याने चिंता वाढली आहे. केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत २२% कमी आहे. गेल्या दहा वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के इतके कमी आहे.

जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये विक्रमी वाढ झाली होती; मात्र ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाणीच आले नाही. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा स्थितीत येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई जाणवू शकते. ‘अल निनो’चा परिणाम पावसावर दिसून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रब्बी पिकांना धोकापावसाचा तुडवडा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेतकऱ्यांवरील ताण आणखी वाढणहर आहे. धरणे कोरडी पडल्याने अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे संकटही निर्माण होऊ शकते.

१२२ वर्षांत सर्वांत कमी पाऊसयंदा १२२ वर्षांतील सर्वांत कमी पावसाची नोंद ऑगस्टमध्ये झाली आहे. ऑगस्ट महिना ऐतिहासिकदृष्ट्या कोरडा राहिला. या महिन्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा किती? :

ऑगस्ट अखेरीस देशातील १५० धरणांमध्ये ११३.४१७ अब्ज घनमीटर (बीसीएम) होता. गेल्यावर्षी या धरणांमध्ये १४६.८२८ बीसीएम जलसाठा होता. गेल्या १० वर्षांची सरासरी साठा पातळी १२५.११७ बीसीएम आहे.

या राज्यांत धरणे रिकामी

महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू.

उत्तर भाग : हिमाचल, पंजाब, राजस्थानपूर्व क्षेत्र : त्रिपुरा, ओडिशा, झारखंड, प.बंगालपश्चिमी क्षेत्र : गुजरात आणि महाराष्ट्रमध्य क्षेत्र : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडदक्षिण क्षेत्र : आंध्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू

 

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरणIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र