शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:49 IST

राहुल गांधी वायनाडमधील घटनेबाबत बोलले होते, पण त्याचा संदर्भ उदयपूर हत्येशी जोडून दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी चॅनेलने माफीदेखील मागितली.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधील व्हिडिओ उदयपूरच्या घटनेशी जोडल्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. याप्रकरणी हिंदी वृत्त वाहिनी झी टीव्हीचा न्यूज अँकर रोहित रंजन यांना मंगळवारी नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चॅनलने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडिओबद्दल चॅनलने माफीही मागितली होती.

सीएम योगींना टॅग केलेदरम्यान, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये जोरदार वादावादी आणि धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. छत्तीसगड पोलिस टीव्ही अँकरला अटक करण्याचा प्रयत्न करत होते, तर गाझियाबादध्ये पोलीस त्या अँकरला दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस घरात दाखल झाल्यानंतर अंकरने सीएम योगी आदित्यनाथ, एसएसपी गाझियाबाद आणि एडीजी लखनऊ यांना टॅग करत ट्विट केले होते की, 'छत्तीसगड पोलिस स्थानिक पोलिसांना न कळवता मला अटक करण्यासाठी माझ्या घरी दाखल झाले आहेत, हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?'

पोलिसांनी अटक वॉरंटही दाखवलेत्यावर छत्तीसगड पोलिसांनी उत्तर दिले की, जर वॉरंट असेल तर कोणालाही माहिती देण्याची गरज नाही. रायपूर पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'माहितीचा असा कोणताही नियम नाही. मात्र, आता युपी पोलिसांना माहिती मिळाली आहे. पोलीस पथकाने तुम्हाला न्यायालयाचे अटक वॉरंटही दाखवले. तुम्ही त्यांना सहकार्य करावे, तपासात सहभागी व्हावे आणि न्यायालयात आपली बाजू मांडावी.' दरम्यान, या सर्व गोंधळात अँकरला अटकेपासून वाचवण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी त्यांना सोबत घेतले. सध्या ते यूपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर सामान्य कलमे लावण्यात आली आहेत.

नेमकं काय प्रकरण आहे?केरळमधील वायनाड येथे राहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तरुणांना उद्देशून राहुल गांधी बोलले होते. ते म्हणाले होते की, 'त्या मुलांना माफ करा.' पण, त्या वक्तव्याचा संबंध उदयपूरच्या हत्येतील आरोपींशी जोडण्यात आला. अँकर रोहित रंजन यांनी तो दिशाभूल करणारा व्हिडिओ चॅनलवर चालवला. यानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अँकरवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ राज्यवर्धन राठौर सारख्या भाजप नेत्यांनीही शेअर केला होता, त्यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

चॅनलने माफी मागितलीया गोंधळानंतर चॅनलने माफीदेखील मागितली होती. रंजन आपल्या शोमध्ये म्हणाले, 'काल आमच्या शोमध्ये उदयपूरच्या घटनेला जोडून राहुल गांधींचे विधान चुकीच्या संदर्भात दाखवण्यात आले होते, ही एक मानवी चूक होती ज्यासाठी आमची टीम माफी मागते.' चॅनेलने माफी मागितली, पण सध्या पोलीस टीव्ही अँकरला अटक करण्यासाठी आले आहेत. यावरुन दोन राज्यांची पोलीस आमने-सामने आले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस