शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

No Confidence motion : भाजपाचं पारडं जड?...मोदी, सुषमा, स्मृती इराणी विरोधकांना पडले होते भारी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 12:10 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे. 

नवी दिल्ली- लोकसभेत तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर आता चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांना सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सततच्या गोंधळामुळे कोणत्याही प्रकारचे कामकाज संसदेत झाले नव्हते. मात्र पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यावर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारला आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले. मात्र ही मोदी सरकारची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. कारण अविश्वासदर्शक ठरावावर फक्त एक दिवस चर्चा होणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळ या चर्चेसाठी उपलब्ध झाला आहे. काँग्रेस पक्षाला या सर्व चर्चेत 38 मिनिटे मिळाली आहेत तर सरकार पक्षाला साडेतीन तास मिळाले आहेत. या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीने सुषमा स्वराज यांच्यासारख्या प्रभावी वक्तृत्त्व असणाऱ्या ज्येष्ठ मंत्र्यांना बोलण्याची संधी दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सर्वात शेवटी चर्चेला उत्तर देतील.

या लोकसभेचा आजवरचा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळेस सरकार ज्या ज्या वेळेस अडचणीत आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्यासारख्या उत्तम वक्त्यांनी आपल्या भाषणाच्या जोरावर बाजी मारून नेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये ज्या विषयांवर टीका होते त्या सर्व विषयांवर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांची अशीच मते होती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वेगळ्या शैलीतून सांगून विरोधकांना गप्प केले होते. ललित मोदीला भारताबाहेर पळून जाण्यास सुषमा स्वराज यांनी मदत केली असा आरोप झाल्यावर सुषमा स्वराज यांनी अत्यंत जोरदार भाषण करत सर्व बाजू विरोधकांवरच उलटवली होती. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी भोपाळ दुर्घटनेसारख्या दुर्देवी घटनेतील अँडरसनसारख्या आरोपींना पळून जाण्यास मदत केली हे काँग्रेसचेच मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या पुस्तकाचा दाखला देत स्पष्ट केले होते. सुषमा स्वराज यांच्या या भाषणानंतर लोकसभेचे स्वरुपच पालटून गेले होते. विरोधकांनी दिलेल्या घोषणांमध्येही त्यांनी भाषण सुरु ठेवलं होतं. अशीच काहीशी स्थिती स्मृती इराणी यांच्या भाषणावेळेस झाली होती. रोहित वेमुला याच्या आत्महत्येसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत त्यांनी आपल्या खात्याची (तेव्हा मनुष्यबळ विकासमंत्री) बाजू मांडली होती. या अत्यंत भावनिक भाषणाच्या वेळेस स्मृती इराणी यांनी आपल्या खात्याची बाजू मांडलीच त्याहून आपण रोहितच्या आत्महत्येनंतर सर्व आवश्यक ती कर्तव्ये कशी पार पाडली हे भाषणातून सांगितले होते. त्यांच्या भाषणानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलताना, आता काही सांगण्याची गरज राहिलेली नाही. मी स्मृती इराणी यांचं कौतुक करतो, हे भाषण संसदेच्या इतिहासातील उत्तम भाषणांपैकी एक आहे असे सांगितले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांच्या भाषणांचे व्हीडिओ नंतरही यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपवर गाजत राहिले. नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांनी कोंडी केल्यावर आपल्या वक्तृत्त्वाद्वारे त्यांच्यावर मात करण्याचा गेली चार वर्षे प्रयत्न केला आहे. आजही तसेच होण्याची शक्यता आहे.  विरोधकांनी स्वतःच  2019 सालच्या निवडणुकीच्या पंतप्रधान मोदी यांना भावनिक भाषण करण्याची संधी दिली आहे.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावSushma Swarajसुषमा स्वराजNarendra Modiनरेंद्र मोदीSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार