शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 9:46 AM

Nitish Kumar Government : एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतीलजेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा लावला फेटाळून

पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखली होती. मात्र एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असा दावा, रजक यांनी केला आहे.श्याम रजक यांनी सांगितले की, हे सर्व आमदार भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे जेडीयूला सोडचिठ्ठी देऊन आरजेडीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या या आमदारांना थांबवण्यात आले आहे. जर हे आमदार सध्या आरजेडीमध्ये दाखल झाले तर त्यांच्यावर पक्षांतर कायद्यांतर्गत कारवाई होऊन त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. मात्र या कायद्यानुसार जेडीयूचे २५ ते २६ आमदार पक्ष सोडून आरजेडीमध्ये आल्यास त्यांच्या सदस्यत्वाला धोका निर्माण होणार नाही.जेडीयूचे अजून काही आमदार पक्ष सोडण्याचा विचार करतील आणि आरजेडीमध्ये दाखल होतील. सध्या माझ्या माध्यमातून हे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात आहेत, असा दावा रजक यांनी केला. तसेच सध्या संपूर्ण घटनाक्रमावर आपली नजर असल्याचेही रजक यांनी सांगितले. भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूच्या सहा आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या घटनेमुळे भाजपा नितीश कुमार यांच्यावर वर्चस्व दाखवू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिहारमधील हे १७ आमदार नाराज आहेत, असा दावा रजक यांनी केला.मात्र जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा फेटाळून लावला आहे. श्याम रजक यांचा दावा भ्रामक आणि दिशाभूल करणारा असल्याचे राजीव रंजन यांनी म्हटले आहे. तसेच जेडीयू पूर्णपणे एकसंध असून, भाजपासोबत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच जेडीयूचे आमदार आरजेडीच्या संपर्कात नाहीत तर आरजेडीचेच आमदार तेजस्वी यादव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची टीका राजीव रंजन यांनी केली.२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२३ आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ आणि इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाPoliticsराजकारण