शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 08:08 IST

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.

- एस. पी. सिन्हापाटणा :  जेडीयू पुन्हा बिहारमध्ये महाआघाडीत सामील झाला आहे. जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना म्हटले की, देश आपली वाट पाहत आहे. नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे संकेत कुशवाह यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिले.

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. आठ ते दहा महिन्यांनंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागतील. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून बोलले होते. हा फोनच बिहारमधील नवीन राजकीय घडामोडींची नांदी ठरला.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयू भाजपशी नाते तोडून महाआघाडीत सामील झाला होता. २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक जेडीयूने महाआघाडीसोबतच लढविली होती. तथापि, महाआघाडी जास्त दिवस टिकली नव्हती. २०१७ मध्ये जेडीयू पुन्हा भाजपसोबत हात मिळवित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाला होता.

काँग्रेस, हम सामील होणार

बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि हम पक्ष सामील होणार असून डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून मदन मोहन झा, अजित शर्मा आणि शकील अहमद यांची नावे चर्चेत आहेत. 

असा आहे फॉर्म्युला

महाआघाडीच्या नवी सरकारसाठी पाच आमदारांमागे एक मंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त जेडीयूचे आठ मंत्री असतील. सर्वांत मोठी भागीदारी  राजदची असेल. राजदच्या १८ जणांना मंत्रिपद मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदासाठी जेडीयू आणि राजदची दावेदारी आहे. नितीश कुमार यांची पसंती विजय कुमार चौधरी यांना आहे.

ध्वनिफिती आल्यानंतर उडणार खळबळ...

बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की, जेडीयूकडे अनेक ध्वनिफिती आहेत. यात भाजपचे नेते त्यांचेच मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना सरकार पाडण्याच्या मोबदल्यात मंत्रिपदाचे आमिष देत आहेत. दोन दिवसांपूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही पत्रकार परिषदेत याकडे लक्ष वेधले होते. जाणकार सूत्रांनुसार महाराष्ट्राप्रमाणे भाजप बिहारमधील  सरकार पाडण्याच्या तयारीत होते; परंतु, वेळीच जेडीयूला भाजपचा हा मनसुबा कळला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजकीय डावपेच आखून डाव फिरविला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाcongressकाँग्रेस