शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 08:08 IST

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.

- एस. पी. सिन्हापाटणा :  जेडीयू पुन्हा बिहारमध्ये महाआघाडीत सामील झाला आहे. जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना म्हटले की, देश आपली वाट पाहत आहे. नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे संकेत कुशवाह यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिले.

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. आठ ते दहा महिन्यांनंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागतील. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून बोलले होते. हा फोनच बिहारमधील नवीन राजकीय घडामोडींची नांदी ठरला.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयू भाजपशी नाते तोडून महाआघाडीत सामील झाला होता. २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक जेडीयूने महाआघाडीसोबतच लढविली होती. तथापि, महाआघाडी जास्त दिवस टिकली नव्हती. २०१७ मध्ये जेडीयू पुन्हा भाजपसोबत हात मिळवित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाला होता.

काँग्रेस, हम सामील होणार

बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि हम पक्ष सामील होणार असून डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून मदन मोहन झा, अजित शर्मा आणि शकील अहमद यांची नावे चर्चेत आहेत. 

असा आहे फॉर्म्युला

महाआघाडीच्या नवी सरकारसाठी पाच आमदारांमागे एक मंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त जेडीयूचे आठ मंत्री असतील. सर्वांत मोठी भागीदारी  राजदची असेल. राजदच्या १८ जणांना मंत्रिपद मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदासाठी जेडीयू आणि राजदची दावेदारी आहे. नितीश कुमार यांची पसंती विजय कुमार चौधरी यांना आहे.

ध्वनिफिती आल्यानंतर उडणार खळबळ...

बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की, जेडीयूकडे अनेक ध्वनिफिती आहेत. यात भाजपचे नेते त्यांचेच मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना सरकार पाडण्याच्या मोबदल्यात मंत्रिपदाचे आमिष देत आहेत. दोन दिवसांपूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही पत्रकार परिषदेत याकडे लक्ष वेधले होते. जाणकार सूत्रांनुसार महाराष्ट्राप्रमाणे भाजप बिहारमधील  सरकार पाडण्याच्या तयारीत होते; परंतु, वेळीच जेडीयूला भाजपचा हा मनसुबा कळला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजकीय डावपेच आखून डाव फिरविला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाcongressकाँग्रेस