शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 08:08 IST

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.

- एस. पी. सिन्हापाटणा :  जेडीयू पुन्हा बिहारमध्ये महाआघाडीत सामील झाला आहे. जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना म्हटले की, देश आपली वाट पाहत आहे. नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे संकेत कुशवाह यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिले.

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. आठ ते दहा महिन्यांनंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागतील. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून बोलले होते. हा फोनच बिहारमधील नवीन राजकीय घडामोडींची नांदी ठरला.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयू भाजपशी नाते तोडून महाआघाडीत सामील झाला होता. २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक जेडीयूने महाआघाडीसोबतच लढविली होती. तथापि, महाआघाडी जास्त दिवस टिकली नव्हती. २०१७ मध्ये जेडीयू पुन्हा भाजपसोबत हात मिळवित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाला होता.

काँग्रेस, हम सामील होणार

बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि हम पक्ष सामील होणार असून डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून मदन मोहन झा, अजित शर्मा आणि शकील अहमद यांची नावे चर्चेत आहेत. 

असा आहे फॉर्म्युला

महाआघाडीच्या नवी सरकारसाठी पाच आमदारांमागे एक मंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त जेडीयूचे आठ मंत्री असतील. सर्वांत मोठी भागीदारी  राजदची असेल. राजदच्या १८ जणांना मंत्रिपद मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदासाठी जेडीयू आणि राजदची दावेदारी आहे. नितीश कुमार यांची पसंती विजय कुमार चौधरी यांना आहे.

ध्वनिफिती आल्यानंतर उडणार खळबळ...

बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की, जेडीयूकडे अनेक ध्वनिफिती आहेत. यात भाजपचे नेते त्यांचेच मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना सरकार पाडण्याच्या मोबदल्यात मंत्रिपदाचे आमिष देत आहेत. दोन दिवसांपूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही पत्रकार परिषदेत याकडे लक्ष वेधले होते. जाणकार सूत्रांनुसार महाराष्ट्राप्रमाणे भाजप बिहारमधील  सरकार पाडण्याच्या तयारीत होते; परंतु, वेळीच जेडीयूला भाजपचा हा मनसुबा कळला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजकीय डावपेच आखून डाव फिरविला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाcongressकाँग्रेस