शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

नीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 6:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक झाली.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक झाली. नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 2024पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठरवलं आहे. मोदी म्हणाले, हे आव्हानात्मक आहे. परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे मंत्र पूर्ण करण्यात नीती आयोगाची महत्त्वाची भूमिका आहे. उत्पन्न आणि रोजगार वाढवण्यासाठी निर्यात क्षेत्रालाही चालना देण्याची गरज आहे.नीती आयोगाच्या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले, 2024पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 34,94,00,00 कोटी रुपये करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हे लक्ष्य आव्हानात्मक आहे, परंतु राज्य सरकारांच्या मेहनतीनं ते गाठू शकतो, राज्यांनी आपापली आर्थिक क्षमता ओळखली पाहिजे. जीडीपीचा टार्गेट वाढवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी जिल्हा स्तरावर काम करण्याची गरज आहे. देश कामगिरी, पारदर्शकता आणि वितरण प्रणालीच्या मार्गावर चालला आहे. त्यामुळेच योजना गरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. गव्हर्निंग काऊंसिलनंही एका अशा सरकारी व्यवस्थेचं निर्माण करावं, त्याच्यावर लोकांचा विश्वास बसेल, असंही मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी पाण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.जलसंधारण मंत्रालयानंही पाण्याचा वापर आणि त्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे. जल संरक्षण आणि जल नियोजन संबंधित प्रयत्न एकाच स्तरावर झाले पाहिजेत, यासाठी केंद्रीय जलसंधारण मंत्रालयानं प्रयत्न केले पाहिजेत. देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. 2024पर्यंत देशातल्या प्रत्येक गावात पाइपलाइननं पाणी पोहोचवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. नक्षलवादासंदर्भातही मोदींनी या बैठकीत भूमिका स्पष्ट केली आहे.हिसेंला आता चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. ज्या राज्यांनी आतापर्यंत आयुष्यमान भारत योजना लागू केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती कार्यान्वित करावी. तसेच त्यासाठी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करावी, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी