शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:44 IST

Nimisha Priya : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आली आहे.

येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आली आहे. सोमवारी भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, या प्रकरणात सरकारला फार काही करता येणार नाही. निमिषाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. तलाल अब्दो महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने न्यायालयाला सांगितलं की, "हे प्रकरण खूपच दुर्दैवी आहे... पण आमच्याही काही मर्यादा आहेत." पुढे असंही स्पष्ट करण्यात आलं की, "आता एकच मार्ग उरला आहे की येमेनी नागरिकाचं कुटुंब 'ब्लड मनी' स्वीकारण्यास तयार व्हावं." या व्यवस्थेनुसार, दोषीच्या वतीने पीडित कुटुंबाला एक ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम किती असावी, हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतात.

सरकार फार काही करू शकत नाही!

अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी कोर्टात सांगितलं की, भारत या प्रकरणात जितकं पुढे जाऊ शकत होतं, तितकं गेलं आहे आणि सरकार आपल्या मर्यादेपर्यंत पोहोचलं आहे. सरकार आता फार काही करू शकत नाही. येमेनच्या संवेदनशीलतेला पाहता, हे प्रकरण राजनैतिक दृष्ट्या हाताळणे योग्य नाही. ब्लड मनी हा एक खासगी करार आहे."

नेमकं काय झालेलं?

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील निमिषा प्रिया ही महदीच्या हत्येची दोषी आढळली आहे. तिने दुसऱ्या एका नर्सच्या मदतीने हा गुन्हा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून येमेनी नागरिकाचा मृतदेह कापून एका भूमिगत टाकीत टाकला होता. यापूर्वी अनेक वेळा निमिषा प्रियाने या आरोपांना आव्हान दिलं होतं, पण कोर्टाने तिची अपील फेटाळून लावली.

काय आहे 'ब्लड मनी'?

सोप्या भाषेत सांगायचं तर, ब्लड मनी म्हणजे दोषीच्या वतीने पीडित कुटुंबाला दिली जाणारी आर्थिक नुकसान भरपाई. विशेषतः अनवधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणात असं घडतं. यानंतर पीडित कुटुंबावर अवलंबून असतं की, ते दोषीला माफ करतात की नाही.

इस्लामिक कायद्यानुसार, गुन्ह्याच्या पीडितांना गुन्हेगारांना कशी शिक्षा द्यावी, याबद्दल आपलं मत देण्याचा अधिकार असतो. हत्येच्या प्रकरणात हे पीडित कुटुंबाला लागू होतं. हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावता येते, पण जर पीडित कुटुंबाची इच्छा असेल, तर एका ठराविक रकमेच्या बदल्यात दोषीला माफी देण्याचा पर्यायही निवडता येतो. याला दिया प्रथा असंही म्हणतात. मात्र, या प्रकरणात तलालच्या कुटुंबाने ब्लड मनी नाकारला आहे.

टॅग्स :KeralaकेरळInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू