शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत नवे राज्यपाल? PM मोदींनी बोलावली मंत्रिमंडळ बैठक; मोठा फेरबदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 06:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे.

हरिश गुप्तानवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे. मोठ्या फेरबदलापूर्वी ही विद्यमान मंत्रिमंडळाची अखेरची बैठक असू शकते, अशी साऊथ ब्लॉकमध्ये चर्चा आहे. अनेक राज्यांत नवीन राज्यपाल व उपराज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपमधील बदल एकाचवेळी होऊ शकतात, असे समजते.

सूत्रांनी सांगितले की, टीम-मोदीमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा फेरबदल होऊ घातला असून, त्याबाबत सहकारी मंत्र्यांना खडे बोल सुनावण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मोदी आपल्या वॉर-टीमला अंतिम स्वरूप देत असून, कमी कार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीच्या अजेंड्याबाबत कोणालाही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, तुमच्या कार्यक्षमतेवर बारीक नजर ठेवली जात आहे, असे मोदींनी मंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. या बैठकीत त्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे.

कमजोर असलेल्या जागांची संख्या वाढलीभाजपने एक सर्वेक्षण केलेले असून, त्यात पक्ष कमजोर असलेल्या लोकसभेच्या जागांची संख्या १४४ वरून १७० गेल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ व आणखी काही महत्त्वाच्या राज्यांतील ही स्थिती आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे उपाध्यक्ष असून, त्यांना प्रजासत्ताक दिनी पक्ष मुख्यालयात तिरंगा फडकावण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. यावरून सर्व काही स्पष्ट होते.

राज्यात कोण येणार; १५ दिवसांत ठरणार?महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्यानंतर आता नवीन राज्यपाल कोण येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या १५ दिवसांत नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राजस्थान भाजपमधील वजनदार नेते ओम माथुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, राज्यसभा सदस्य राहिलेले मध्य प्रदेशातील भाजपचे नेते प्रभात झा, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे चर्चेत आहेत. माथूर हे २०१४च्या निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राहिले आहेत. राज्यातील भाजपच्या नेत्यांशी त्यांचे स्रेहपूर्ण संबंध आहेत. सुमित्रा महाजन मध्य प्रदेशातील असल्या तरी मराठी आहेत आणि त्यांचे माहेर मुंबई आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले अमरिंदरसिंग हे भाजपचे पंजाबमधील नेते आहेत.लोकसभा, विधानसभा निवडणूक दीड-दोन वर्षांवर असताना भाजप परिवारातील व्यक्तीची आणि त्यातही महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून संधी दिली जाऊ शकते. राज्यात कोण येणार? याची चर्चा आता रंगली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी