शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवा वाद : भाजप, लोजपाला वगळून नितीशकुमारांनी केला मंत्रिमंडळ विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 03:04 IST

आठही मंत्री जदयूचे : केंद्रातील अवमानाचा वचपा काढल्याची चर्चा

एस. पी. सिन्हा पाटणा : भाजप, लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) या मित्रपक्षांना वगळून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले आठही मंत्री जनता दल (यू)चे आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ बनविताना मोदी सरकारने केलेल्या अपमानाचा जनता दल (यू)ने बिहारमध्ये अशा प्रकारे वचपा काढल्याची चर्चा आहे.

नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्य मंत्रिमंडळात भाजपला एक जागा देऊ केली होती. या गोष्टीला दुजोरा देत बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले की, ही जागा नंतर भरण्याचे भाजपने ठरविले आहे.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात जनता दल (यू)ला एक मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र संसदेत आमच्या पक्षाचे जितके सदस्य आहेत त्या तुलनेत मंत्रीपदे मिळाली पाहिजेत, अशी नितीशकुमार यांनी केलेली मागणी भाजपने मान्य केली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय जनता दल (यू)ने घेतला होता. मात्र मोदींच्या व त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधीस नितीशकुमार हजर राहिले.

बिहारमध्ये जनता दल (यू) व भाजपचे आघाडी सरकार आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यातील ४० पैकी भाजपने १७ व जनता दल (यू)ने १६ जागा जिंकल्या आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीतही जनता दल (यू) केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाला नव्हता.

कोणतेही मतभेद नाहीत, सर्व काही आलबेलयेत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-जदयूमध्ये फूट पडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळूनही मंत्रिमंडळात योग्य तो सन्मान न मिळाल्याने जदयूमध्ये नाराजी असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे.नितीशकुमार यांनी म्हटले की, भाजपसोबत सर्व काही आलबेल आहे. भाजप नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही एनडीएमध्ये २०० टक्के ठीकठाक असल्याचा दावा केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणताही वाद नाही. भाजप मंत्र्यांना विस्तारात समाविष्ट करण्याचे पक्ष नेतृत्वाने सध्या टाळले, असे टिष्ट्वट केले.

जातीपातीच्या गणितांचा विचारजातीपातीची गणिते लक्षात ठेवून बिहार मंत्रिमंडळाच्या विस्तारात मागासवर्गीय, उच्चवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, दलित या वर्गांना प्रत्येकी दोन पदे दिली आहेत. २०२० साली होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी नव्या आठ मंत्र्यांना रविवारी शपथ दिली. नितीशकुमार यांनी सत्तेवर आल्यानंतर केलेला हा दुसरा विस्तार आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी