उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:07 IST2026-01-14T14:05:59+5:302026-01-14T14:07:56+5:30
NEET PG Cut Off Criteria: कट-ऑफ घटवण्याच्या निर्णयाने देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
NEET PG Cut Off Criteria: केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने NEET PG २०२५ च्या क्वालिफाइंग कट-ऑफमध्ये मोठी कपात केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. या निर्णयामुळे SC, ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना आता उणे ४०पर्सेंटाइल गुण मिळाले तरीही MS-MD सारख्या पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. जनरल आणि EWS प्रवर्गासाठीही कट-ऑफ कमी करण्यात आला आहे.

हा निर्णय मुख्यतः मेडिकल पीजी कोर्सेसमधील हजारो रिक्त जागा भरून काढण्यासाठी घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, या धोरणामुळे देशाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
कट-ऑफमध्ये किती आणि का कपात?
आतापर्यंत SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी NEET PG मध्ये किमान ४० पर्सेंटाइल आवश्यक होता. म्हणजेच 800 गुणांच्या परीक्षेत साधारण २३०-२४० गुण मिळवणे बंधनकारक होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हा निकष थेट शून्यपेक्षा खाली आणण्यात आला आहे. याचा अर्थ, अत्यंत कमी किंवा निगेटिव्ह स्कोअर असलेले उमेदवारही जागा उपलब्ध असल्यास प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा NEET PG २०२५ ची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू असून, तिसरी काउंसिलिंग अद्याप सुरू झालेली नाही. अंदाजे ९ हजारांहून अधिक पीजी मेडिकल सीट्स रिक्त राहण्याची शक्यता होती. पात्र उमेदवारांची संख्या अपुरी असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
Until now, the minimum qualifying criterion for PG medical seats for SC, ST, and OBC candidates was the 40th percentile, about 235 marks out of 800.
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) January 13, 2026
As per an order of the Ministry of Health, this has been reduced to the 0th percentile, meaning even a score of –40 out of 800 is…
या निर्णयावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका डॉक्टराने लिहिले आहे की, “जीवन-मरणाशी थेट संबंधित असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात किमान पात्रतेशी तडजोड करणे अत्यंत धोकादायक आहे. जगात कदाचित आपणच असा देश आहोत, जिथे अशा प्रकारची घसरण प्रोत्साहितही केली जाते.”
This is deeply troubling. Those who crafted this policy will rarely, if ever, encounter these doctors in their own care, opting for elite facilities instead.
— रोहितsharma🇮🇳 (@rishu5171) January 13, 2026
Meanwhile, it’s the honest, tax-paying, hardworking poor who will suffer the most from any erosion of medical…
दुसऱ्या एका युजरने चिंता व्यक्त करत म्हटले की, “ही पॉलिसी बनवणारे लोक स्वतः कधीही अशा डॉक्टरांकडून उपचार करून घेणार नाहीत. सामान्य, मेहनती आणि कर भरणाऱ्या नागरिकांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.”
Exam- NEET PG
— Anuradha Tiwari (@talk2anuradha) January 14, 2026
Cur off - Minus 40 marks
Result - Selected
This is the new criteria for SC/ST/OBCs.
Someone who just sits for the exam will become doctor and do surgeries.
This country has no future for hardworking people.
The collapse has already begun ! pic.twitter.com/dVFa78k3FJ
PG स्तरावर फक्त मेरिट हवे...
काही जणांच्या मते, MBBS चे पाच-साडेपाच वर्षांचे कठोर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एक सक्षम डॉक्टर बनतो. त्यामुळे PG स्तरावर आरक्षणाऐवजी केवळ मेरिटच निकष असावा. विशेषतः आर्थिक निकषांव्यतिरिक्त इतर आधारांवर सवलत देणे योग्य आहे का, यावरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
After you study for five years at par with your fellow students you almost become a good doctor irrespective of what background you came from
— Damini (@Daminihere) January 13, 2026
By now
You should ||
There is no reason for reservation in PG level except for economical grounds .
Only merit then has to be the base ||
आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार का?
अनेकांच्या मते ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. रिक्त जागा राहिल्यास आरोग्यसेवा अधिकच अडचणीत येईल. मात्र विरोधकांचा सवाल आहे की, प्रवेशाचे निकष खूपच शिथिल केल्यास वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.