शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बिहारमध्ये एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजपा, जेडीयू प्रत्येकी 17 जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 15:43 IST

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली जेडीयू, लोक जनशक्ती पक्षाची बैठक

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये एनडीएचं  जागावाटप निश्चित झालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा झाली. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान उपस्थित होते. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी 17, तर लोक जनशक्ती पक्ष 6 जागांवर निवडणूक लढवेल. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीए गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास अमित शहांनी बैठकीनंतर व्यक्त केला. तर मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी 2009 पेक्षा अधिक जागा जिंकून दाखवू, असा दावा केला. राज्यसभेच्या पुढील निवडणुकीत रामविलास पासवान यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. 'तिन्ही पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटप करण्यात आलं. लवकरच आम्ही आमचा अजेंडा लोकांसमोर ठेऊ,' असं शहा यांनी सांगितलं.  एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला, तरी अद्याप कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळणार हे ठरलेलं नाही, अशी माहिती मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी दिली. 'आज जागावाटप निश्चित झालं आहे. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, हे अजून ठरलेलं नाही. मात्र ते लवकरच ठरेल,' अशी माहिती कुमार यांनी दिली. 'आम्ही बिहारमध्ये चांगलं यश मिळवलं आहे. मला गरजेपेक्षा जास्त बोलायची सवय नाही. 2009 मध्ये भाजपा आणि जेडीयूची युती होती. त्यावेळी आम्ही  बिहारमध्ये 40 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही त्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :BiharबिहारAmit Shahअमित शाहBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार