शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:00 IST

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल 

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागावाटप निश्चित झालं आहे. या निवडणुकीत आजसू १० जागांवर तर जेडीयू २, चिराग पासवान यांच्या एलजेपीला १ आणि उर्वरित ६८ जागांवर भाजपा निवडणूक लढणार आहे. केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली. झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएकडून ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन, जनता दल(यू) आणि लोकजनशक्ती पार्टी मिळून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. याठिकाणी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे भाजपा सहप्रभारी हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढली जाणार आहे. भाजपा ६८ जागांवर निवडणूक लढेल तर आजसूला १० जागा देण्यात आल्या आहेत. आजसू पक्षाला देण्यात आलेल्या जागांमध्ये सिल्ली, रामगड, गोमिया, इचागड, मांडू, जुगसलिया, डुमरी, पाकुड, लोहरदगा, मनोहरपूर या जागांचा समावेश आहे. तर जेडीयूला जमशेदपूर पश्चिम, तमाड आणि चतरा येथील जागा चिराग पासवान यांच्या पक्षाला दिली आहे.

२ टप्प्यात होणार मतदान

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला ३८ जागांवर मतदान होईल. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगानुसार, झारखंडमध्ये एकूण मतदारांची संख्या २५ कोटी ५१ लाख ८ हजार ६४२ इतकी आहे. ज्यात पुरुष मतदार १२ कोटी ९९ लाख ७ हजार ३२५ आणि महिला मतदारांची संख्या १२ कोटी ५२ लाख ९१० इतकी आहे.

झारखंडमध्ये किती जागांवर लढत?

दरम्यान, छोटा नागपूरच्या पठारवरील जंगलांनी वेढलेल्या झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागांसाठी लढत होणार आहे. विधानसभेत सरकार आणण्यासाठी ४२ जागांचे बहुमत आणावे लागेल. मागील २०१९ च्या निवडणुकीत ३० जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष बनला होता. 

महाराष्ट्राचं जागावाटप कधी?

झारखंडसोबत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक होणार आहे. याठिकाणी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाईल. झारखंडमध्ये एनडीएचं जागावाटप झालं परंतु अद्याप महाराष्ट्रातील जागावाटप निश्चित नाही. महाराष्ट्रात महायुतीत भाजपा सर्वाधिक जागा लढणार हे स्पष्ट असले तरी शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाchirag paswanचिराग पासवान