शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 15:09 IST

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं.

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही संकटांचा डोंगर येथील पूरपीडित नागरिकांसमोर उभा आहे. पंचगंगा, कोयना आणि कृष्णा नदीच्या महापुरात हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेले होते. तर, नाशिक, सातारा आणि कोकणातील काही भागांनाही पूराचा सामना सहन करावा लागला. या पूरस्थितीत स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, कोस्टल गार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन हजारो जीव वाचवले असून लाखोंना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. 

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली. तर, केवळ भारतीय वायू दलाने 14,000 नागरिकांना एअरलिफ्ट करत त्यांचा जीव वाचवला आहे. 

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यातही गेल्या 7 दिवसांपासून पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पूरस्थितीतून भारतीय नौदलाने तब्बल 14000 नागरिकांना एअरलिफ्ट करुन आणि बोटींच्या त्यांचा जीव वाचवला. वर्षा राहत या ऑपरेशन अंतर्गत वायू दलाची 41 पथके विविध राज्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत होती. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने ही पथके आपलं कर्तव्य बजावत होती. गेल्या 30 वर्षातील हे सर्वात मोठे ऐतिहासिका बचाव कार्य असल्याचे वायू दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. नौदलाच्या पथकांकडून महाराष्ट्र आणि गोव्यातून तब्बल 11,124 लोकांना वाचविण्यात आले आहे. नौदलाच्या हेलिकॉप्टरने 1890 किलो वजनाचे बचाव आणि मदत साहित्य महाराष्ट्रात पुरवले असून कर्नाटकमध्ये 1305 किलो सामान देण्यात आलं आहे. 

दरम्यान, स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3,  तसेच नौदलाच्या 18, तटरक्षक दलाचे 8, आर्मी 17, उपलब्ध बोटी 163  अशी पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत कोल्हापूर येथील 3 लाख 36 हजार 297 तर सांगली येथील 1 लाख 74 हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरindian navyभारतीय नौदल