शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:32 IST

Cloudburst Updates: हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला. एकाच दिवशी राज्यात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. त्यामुळे अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. ३० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असून, १० जणांचा मृत्यू झाला आहे. 

हिमाचल प्रदेशमधील अनेक भागात निसर्गाचा प्रकोप बघायला मिळाला. तब्बल ११ ठिकाणी ढगफुटी झाली. नद्या-नाल्यांना अचानक आलेला पूर आणि बऱ्याच ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे हाहाकार उडाला. राज्यातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या या घटनांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ३० जण बेपत्ता असून, यात एकाच घरातील ६ जणांचा समावेश आहे. सगळ्यात जास्त कहर मंडी जिल्ह्यात झाला आहे. या पावसाने २०२३ च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हिमाचल प्रदेशात मंगळवारी ११ ठिकाणी ढगफुटी झाली. चार ठिकाणी अचानक पूर आला, तर एका ठिकाणी भयंकर भूस्खलन झाल्याची घटना घडली. यात सर्वात जास्त फटका मंडी जिल्ह्याला बसला आहे. मंडी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, २४ तासांमध्ये २५३.८ मिमी पाऊस पडला आहे. 

कोणत्या ठिकाणी झाली ढगफुटी?

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१ जुलै) दिवसभरात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. यातील सात ठिकाणे मंडी जिल्ह्यातील आहेत. अचानक आलेल्या पुरांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. चुलाथाजमध्ये अचानक पूर आल्याने शेकडो झाडे उन्मळून पडली आणि वाहून गेली. 

वाचा >>तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली

पुराच्या पाण्यात अनेकजण वाहून गेले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातील ६ जण बेपत्ता आहेत. 

मंडी जिल्ह्यातील गोहरमध्ये चार ठिकाणी, करसोगमध्ये तीन ठिकाणी, तर धरमपूरमध्ये दोन ठिकाणी तर थुनागमध्ये एका ठिकाणी ढगफुटी झाली. 

twitter embed code

५०० कोटींचे नुकसान

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सांगितले की, आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. 

aitohumanizetextconverter.com

मंडी, ऊना, बिलासपूर, हमीरपूर आणि शिमला या जिल्ह्यांना पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात अचानक पूर येण्याचा धोका असून, प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. 

मदत आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत. एसडीआरएफची पथकेही पोलिसांसोबत मदत कार्यात आहेत. मंडी जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHimachal Pradeshहिमाचल प्रदेशDeathमृत्यूlandslidesभूस्खलन