शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

जम्मू-काश्मीर महामार्गावर टीएनटी स्फोटके जप्त

जम्मू-काश्मीर महामार्गावर टीएनटी स्फोटके जप्त
उधमपूर: जम्मू-काश्मिरात मंगळवारी उधमपूर जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर टीएनटी स्फोटके जप्त करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पथक पहाटे ५.३० वाजता महामार्ग स्वच्छ करण्याच्या कामात व्यस्त असताना खेरी भागात रस्त्याच्या काठावर टीएनटी पेरून ठेवल्याचे आढळले. दुसऱ्या एका घटनेत जम्मूच्या नरवाल क्षेत्रात झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला ४०० राऊंड दारुगोळा जप्त केला.

राहुल गांधींची ओडिशात शेतकरी बचाव पदयात्रा
भुवनेश्वर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या १० सप्टेंबरला दोन दिवसांसाठी ओडिशाच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते बडगड जिल्ह्यात शेतकरी बचाव पदयात्रेचे नेतृत्व करतील. केंद्र व राज्यातील बिजू जनता दल सरकारला अनेक आघाड्यांवर आलेले अपयश जनतेपुढे आणण्याकरिता ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रसाद हरिचंदन यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.


मानवरहित रेल्वे क्रासिंगवरील अपघातात चार ठार
मैनापुरी: जिल्ह्यातील एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेेगाडीने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारजण ठार तर अन्य सहा जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोगाव क्षेत्रात रजवाना मार्गावर प्रवासींनी गच्च भरलेली एक कार मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना हा अपघात झाला.


श्रीलंकेच्या नौदलाकडून १६ मासेमारांना अटक
रामेश्वरम: श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय जलसीमा रेषेचे उल्लंघन केल्याच्या आरोपात पुडुकोट्टई जिल्ह्याच्या जगधापट्टिनम येथून १६ मासेमारांना अटक केली. हे मासेमार कोडियाकराई किनाऱ्यावर भारतीय जलक्षेत्रात मासेमारी करीत होते,अशी माहिती मासेमार संघाचे अध्यक्ष एस. एमिरेट यांनी दिली.

कच्चा कैद्याला बाजारात नेणारे पोलीस बडतर्फ
नवी दिल्ली: एका कच्चा कैद्याला आग्रा न्यायालयात सुनावणीनंतर खरेदीसाठी बाजारात घेऊन जाणाऱ्या एका उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे सर्व दिल्ली सशस्त्र पोलिसांच्या तिसऱ्या तुकडीत तैनात होते.

२० हजारासाठी सावत्र मुलीला विकले
एटा: उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील नागला बुर्ज गावात राहणाऱ्या विरमादेवी नामक महिलेने तिच्या १७ वर्षीय सावत्र मुलीला २० हजार रुपयात मध्य प्रदेशातील एका ५२ वर्षीय इसमास विकल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने यासंदर्भात पोलिसात तक्रार केली असून तपास सुरू आहे.

आसाममधील भूस्खलनात मायलेकीचा मृत्यू
रांगिया: आसामच्या कामरुप (ग्रामीण) जिल्ह्यातील अमीनगाव भागात मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने मायलेकीचा मृत्यू झाला. वृत्त कळताच चंगसारी छावणीतील एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन दोघींचे मृतदेह बाहेर काढले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे.

बेकायदेशीर शस्त्र निर्मिती कारखान्याचा भंडाफोड
एटा: पोलिसांनी परोली गावात धाड घालून बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारखान्यातून असंख्य देशीकट्ट्यांसह शस्त्रास्त्र निर्मितीची उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलाशचंद्र यांनी दिली.

जम्मू-काश्मिरात वकिलांच्या संपाने न्यायालयाचे कामकाज ठप्प
श्रीनगर: हायकोर्ट बार असोसिएशनने संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात संप पुकारल्यामुळे मंगळवारी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांमधील कामकाज ठप्प होते. मोहम्मद अब्दुल्ला पंडित यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी वकिलांनी केली आहे.

मथुरेत दोन शस्त्र तस्करांना अटक
मथुरा: उत्तर प्रदेशात शस्त्रतस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मथुरा, हाथरस आणि अलिगडमधील विविध दुकानांमध्ये चोरीच्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना अटक करून त्यांच्याजवळील एक रिव्हॉल्वर,१२ बंदुका आणि २४ काडतूस जप्त केले.

मदरशांवर तिरंगा फडकविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
अलाहाबाद: देशाचा स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनी राज्यातील मदरशांमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्यात येतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले. यासंदर्भात आवश्यक ते आदेश काढण्याची सूचनाही मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. यशवंत वर्मा यांच्या पीठाने दिले.