शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनावर नरेंद्र मोदींची नरमाई

By admin | Updated: February 28, 2015 05:29 IST

वादग्रस्त भूसंपादन विधेयकापासून माघार नाहीच अशी भाषा सरकारकडून अगदी कालपर्यंत केली जात असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकापासून माघार नाहीच अशी भाषा सरकारकडून अगदी कालपर्यंत केली जात असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरमाई दाखवत प्रस्तावित विधेयकात सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले व विरोधकांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता समर्थन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, अहंकार बाजूला ठेवा. आम्ही जे केले त्यापेक्षा चांगले असूच शकत नाही, अशी भाषा नको. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने २०१३ मध्ये जमीन कायदा पारित केला तेव्हा आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवत उभे ठाकले होते. तुम्हाला राजकीय लाभ घ्यायचा हे आम्हाला माहीत होते. तरीही आम्ही तुमच्यासोबत होतो, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य बनविले. संपुआ सरकारने पारित केलेला जमीन कायदा शेतकऱ्यांच्या हिताला बाधक असल्याचे सांगत सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यात बदल सुचविले होते. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याबाबत शेतकऱ्यांचा विचार करा, सिंचनाचा, पायाभूत सुविधांचा विचार करा अशी मागणी केली होती. सांघिक संरचनेत मुख्यमंत्र्याचा आवाज न ऐकण्याइतपत आम्ही मग्रूर नाही. आपण शेतकऱ्यांचे हित डावलू शकतो काय? चूक सुधारणे ही आपली जबाबदारी नाही काय? तुम्ही जे केले ते आम्ही नाकारत नाही. उगाच राजकारण करू नका, असे काँग्रेसला सुनावले. ‘मनरेगा’ हे अपयशाचे स्मारक !७० मिनिटांच्या भाषणात मोदींनी मनरेगा, काळा पैसा, भ्रष्टाचार आणि कोळसा खाणपट्टे वाटप यासारख्या मुद्यांसह सांघिकतेला बळकटी देण्यासाठी राज्यांचे सबलीकरण, स्वच्छता मोहीम आणि जनधन योजनेचा उल्लेख केला. मनरेगा योजना बंद पडल्याची अफवा पसरवली जात आहे. काही क्षेत्रात माझ्याकडे हुशारी नाही, मात्र किमान राजकीय हुशारी तरी आहे. ही योजना बंद कशी पाडू? मनरेगा हे अपयशाचे स्मारकच आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसची टर उडविली. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली तरी गरिबांना खड्डे खोदायला भाग पाडले जावे, असे तुम्हाला वाटते. तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या, त्याच्या पाऊलखुणा उरल्या आहेत. हे लोकांना कळायला हवे, असे मोदी उपरोधिकपणे म्हणाले.