शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

सुप्रीम कोर्टाच्या मुद्यावर मोदींनी सोडलं मौन, म्हणाले सरकार व राजकीय पक्षांनी यापासून दूर राहावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 09:23 IST

सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे.सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे. सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं. न्यायपालिका त्यांच्या समस्यांचं समाधान काढण्यासाठी एकत्र बसेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. 

भारतीय न्यायपालिकेचा एक उज्जव काळ होता, ही न्यायपालिका सक्षम लोकांनी परिपूर्ण आहे. हीच न्यायपालिका एकत्र बसेल आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करेल. आपल्या न्याय प्रणालीवर माझा विश्वास असून ते निश्चितपणे या वादावर तोडगा काढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचा कारभार सुरळीत होत नसल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर सुप्रीम कोर्टातील वाद चव्हाट्यावर आला. याच मुद्द्यावर मोदींनी मतं मांडली. 'मला वाटत सुप्रीम कोर्टाच्या वादावरील चर्चेपासून मला लांब रहायला हवं, सरकारलाही यापासून लांब राहायला हवं. तसंच राजकीय पक्षांनीही यापासून दूर राहावं, असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर निशाणा साधण्याची तसंच भाजपाच्या हाय प्रोफाइल नेत्यांना संकटात टाकण्याचे विरोधी पक्षांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. याप्रश्नावरही मोदींनी उत्तर दिलं. राजकीय दृष्टीने मला संपविण्याचे खूप प्रयत्न झाले. मी आता जेथे आहे, तेथे पोहचण्यासाठी त्यांचीच मला मदत झाली, अशी टीका मोदींनी विरोधकांचं नाव न घेता केली. 

दरम्यान, 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्या. जे चेलमेश्वर, न्या.  रंजन गोगोई, न्या. मदन लोकून आणि न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचं कामकाज योग्यरित्या चालत नसल्याची टीका केली होती. इतकंच नाही, तर या चार न्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरही टीका केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय