शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सुप्रीम कोर्टाच्या मुद्यावर मोदींनी सोडलं मौन, म्हणाले सरकार व राजकीय पक्षांनी यापासून दूर राहावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 09:23 IST

सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे.सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे. सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं. न्यायपालिका त्यांच्या समस्यांचं समाधान काढण्यासाठी एकत्र बसेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. 

भारतीय न्यायपालिकेचा एक उज्जव काळ होता, ही न्यायपालिका सक्षम लोकांनी परिपूर्ण आहे. हीच न्यायपालिका एकत्र बसेल आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करेल. आपल्या न्याय प्रणालीवर माझा विश्वास असून ते निश्चितपणे या वादावर तोडगा काढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचा कारभार सुरळीत होत नसल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर सुप्रीम कोर्टातील वाद चव्हाट्यावर आला. याच मुद्द्यावर मोदींनी मतं मांडली. 'मला वाटत सुप्रीम कोर्टाच्या वादावरील चर्चेपासून मला लांब रहायला हवं, सरकारलाही यापासून लांब राहायला हवं. तसंच राजकीय पक्षांनीही यापासून दूर राहावं, असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर निशाणा साधण्याची तसंच भाजपाच्या हाय प्रोफाइल नेत्यांना संकटात टाकण्याचे विरोधी पक्षांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. याप्रश्नावरही मोदींनी उत्तर दिलं. राजकीय दृष्टीने मला संपविण्याचे खूप प्रयत्न झाले. मी आता जेथे आहे, तेथे पोहचण्यासाठी त्यांचीच मला मदत झाली, अशी टीका मोदींनी विरोधकांचं नाव न घेता केली. 

दरम्यान, 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्या. जे चेलमेश्वर, न्या.  रंजन गोगोई, न्या. मदन लोकून आणि न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचं कामकाज योग्यरित्या चालत नसल्याची टीका केली होती. इतकंच नाही, तर या चार न्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरही टीका केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय