शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सुप्रीम कोर्टाच्या मुद्यावर मोदींनी सोडलं मौन, म्हणाले सरकार व राजकीय पक्षांनी यापासून दूर राहावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 09:23 IST

सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे.सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे. सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं. न्यायपालिका त्यांच्या समस्यांचं समाधान काढण्यासाठी एकत्र बसेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. 

भारतीय न्यायपालिकेचा एक उज्जव काळ होता, ही न्यायपालिका सक्षम लोकांनी परिपूर्ण आहे. हीच न्यायपालिका एकत्र बसेल आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करेल. आपल्या न्याय प्रणालीवर माझा विश्वास असून ते निश्चितपणे या वादावर तोडगा काढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचा कारभार सुरळीत होत नसल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर सुप्रीम कोर्टातील वाद चव्हाट्यावर आला. याच मुद्द्यावर मोदींनी मतं मांडली. 'मला वाटत सुप्रीम कोर्टाच्या वादावरील चर्चेपासून मला लांब रहायला हवं, सरकारलाही यापासून लांब राहायला हवं. तसंच राजकीय पक्षांनीही यापासून दूर राहावं, असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर निशाणा साधण्याची तसंच भाजपाच्या हाय प्रोफाइल नेत्यांना संकटात टाकण्याचे विरोधी पक्षांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. याप्रश्नावरही मोदींनी उत्तर दिलं. राजकीय दृष्टीने मला संपविण्याचे खूप प्रयत्न झाले. मी आता जेथे आहे, तेथे पोहचण्यासाठी त्यांचीच मला मदत झाली, अशी टीका मोदींनी विरोधकांचं नाव न घेता केली. 

दरम्यान, 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्या. जे चेलमेश्वर, न्या.  रंजन गोगोई, न्या. मदन लोकून आणि न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाचं कामकाज योग्यरित्या चालत नसल्याची टीका केली होती. इतकंच नाही, तर या चार न्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरही टीका केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय