शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

लोकसभेच्या 'या' ४२९ जागा जिंकायच्या कशा?; मोदी-शहांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 3:46 PM

'मिशन २०१९'साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये 'कमळ' कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय.

नवी दिल्लीः देशातील २० राज्यांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्याचा पराक्रम करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्षअमित शहा ही जोडी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर चक्रव्यूहात अडकल्याचं चित्र आहे. 'मिशन २०१९'साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये 'कमळ' कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय. त्याचं कारण आहे, विरोधी पक्षांनी केलेली हातमिळवणी आणि त्यांच्यात वाढू लागलेली एकी.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, पण सत्तासुंदरीनं त्यांना हूल दिली. अक्षरशः त्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला गेला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणाऱ्या काँग्रेस-जेडीएसनं गट्टी केली. त्यांना मायावतींनीही 'टाळी' दिली आणि बीएस येडियुरप्पांना अडीच दिवसांत मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. बहुमत चाचणीआधीच त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपा पार नाकावर आपटली. त्यानंतर, 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या न्यायाने देशभरातील विरोधक एकत्र आलेत. कुमारस्वामींच्या शपथविधीला देशभरातील भाजपाविरोधी पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. २०१९च्या लोकसभा महासंग्रामात मोदी-शहांचा विजयरथ रोखण्याचा विडाच त्यांनी उचललाय. 

उत्तर प्रदेशः (एकूण जागा - ८०)२०१४ मध्ये उत्तर प्रदेशनं मोदी-शहांना भक्कम साथ दिली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही जनतेनं भाजपाला कौल दिला होता. परंतु, अलीकडेच झालेल्या फुलपूर आणि गोरखपूर पोटनिवडणुकीत अखिलेश-माया एकत्र आले आणि 'कमळ' कोमेजलं. त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेस-सपा-बसपाची आघाडी झाल्यास, गेल्या निवडणुकीत ८० पैकी ७३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला मोठा फटका बसू शकतो. 

बिहारः (एकूण जागा - ४०)नितीश कुमार रालोआत आल्यानं, २०१९ मध्ये बिहारमधील आकडा आणखी वाढवण्यासाठी मोदी-शहा मोर्चेबांधणी करत होते. परंतु, आता काँग्रेस-राजदची एकी त्यांना टक्कर देऊ शकते. मोदींच्या पराभवासाठी काँग्रेस नेते लालूंना टाळी द्यायला मागे-पुढे पाहतील असं वाटत नाही. 

पश्चिम बंगालः (एकूण जागा - ४२)तृणमूल काँग्रेसचा, ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारण्याचा भाजपाची रणनीतीही फ्लॉप ठरू शकते. काँग्रेस-तृणमूल एकत्र येतीलच, पण डावेही त्यांना साथ देऊ शकतात. तसं झाल्यास मोदी-शहांच्या अडचणी फारच वाढतील. 

कर्नाटकः (एकूण जागा - २८)कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा या हेतूने येडियुरप्पांनी राजीनामा देताना भावनिक साद घातली आहे. परंतु, काँग्रेस-जेडीएस २०१९ मध्येही एकत्र मैदानात उतरले तर सगळीच समीकरणं बदलतील आणि भाजपाची कोंडी होईल. महाराष्ट्रः (एकूण जागा - ४८)लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे संकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले आहेत. त्यासोबतच, भाजपावर कुरघोडी करण्यासाठी झटणारी शिवसेनाही स्वबळावर लढली, तर भाजपाला 'जोर का झटका' लागू शकतो.   

त्याशिवाय, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या साथीने पाय रोवण्याचे भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी काँग्रेस-द्रमुक युती करू शकतात. ओडिशामध्येही बीजू जनता दल आणि काँग्रेस यांच्यात तह होऊ शकतो. दुसरीकडे, रालोआची साथ सोडणारा तेलुगू देसम पक्षही काँग्रेसच्या मदतीला जाऊ शकतो. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने आधीच हातमिळवणी केली आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हं आहेत. 

हे सगळं गणित बघता, लोकसभेच्या ४२९ जागांसाठी रणनीती आखताना मोदी-शहा आणि त्यांच्या टीमची चांगलीच दमछाक होणार आहे. अर्थात, विरोधकांची आत्ता झालेली एकी किती टिकते, यावरच पुढचं सगळं राजकारण अवलंबून आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८