शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, मुस्लिमांनी घाबरू नये; CAA बाबत अमित शाह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:09 IST

'CAA मुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, असा गैरसमज विरोधक पसरवत आहेत.'

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) लागू केल्यानंतर विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तसेच, या कायद्याला मुस्लिमविरोधी कायदा असल्याचे सांगितले जात आहे. पण, या कायद्याद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, असे सरकारकडूनही वारंवार सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा याचा पुन्नरुच्चार केला. 

न्यूज18 च्या 'रायझिंग भारत 2024' मध्ये बोलताना अमित शाह म्हणाले की, सीएए मंजुर झाल्यानंतर देशात मोठा गैरसमज पसरला. जेव्हा सत्याबद्दल गैरसमज पसरवले जातात, तेव्हा सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सत्तेत असलेल्या पक्षाची असते. विरोधकांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल केली. CAA मुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाईल, असा गैरसमज विरोधकांनी पसरवला. पण, देशातील मुस्लिमांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. CAA हा नागरिकत्व घेण्यासाठी नसून, तो निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.'

ते पुढे म्हणाले, 'सीएएद्वारे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अत्याचाराला कंटाळऊन भारतात आलेल्या शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि हिंदुंना नागरिकत्व दिले जाणार आहे. अनेक वर्षांपासून निर्वासितांचे जीवन जगत आहेत. त्यांना ना सरकारी नोकरी मिळते, ना ते घर खरेदी करू शकतात. काँग्रेसकडे याचे उत्तर नाही, ते फक्त व्होट बँकेचे राजकारण कत आहेत.' 

'मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, या देशातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. CAA नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेस, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि राजेंद्र बाबू इ…या सर्वांनी वचन दिले होते की आम्ही, पाकिस्तान, बांगलादेशा आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या सर्व निर्वासितांना नागरिकत्व देऊ. काँग्रेस पक्षाने ते आश्वासन पूर्ण केले नाही, ते आम्ही पूर्ण करत आहोत. राहुल गांनींचा या ऐतिहासिक कागदपत्रांशी काहीही संबंध नाही. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसBJPभाजपा