शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, मुस्लिमांनी घाबरू नये; CAA बाबत अमित शाह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:09 IST

'CAA मुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, असा गैरसमज विरोधक पसरवत आहेत.'

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) लागू केल्यानंतर विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तसेच, या कायद्याला मुस्लिमविरोधी कायदा असल्याचे सांगितले जात आहे. पण, या कायद्याद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, असे सरकारकडूनही वारंवार सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा याचा पुन्नरुच्चार केला. 

न्यूज18 च्या 'रायझिंग भारत 2024' मध्ये बोलताना अमित शाह म्हणाले की, सीएए मंजुर झाल्यानंतर देशात मोठा गैरसमज पसरला. जेव्हा सत्याबद्दल गैरसमज पसरवले जातात, तेव्हा सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सत्तेत असलेल्या पक्षाची असते. विरोधकांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल केली. CAA मुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाईल, असा गैरसमज विरोधकांनी पसरवला. पण, देशातील मुस्लिमांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. CAA हा नागरिकत्व घेण्यासाठी नसून, तो निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.'

ते पुढे म्हणाले, 'सीएएद्वारे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अत्याचाराला कंटाळऊन भारतात आलेल्या शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि हिंदुंना नागरिकत्व दिले जाणार आहे. अनेक वर्षांपासून निर्वासितांचे जीवन जगत आहेत. त्यांना ना सरकारी नोकरी मिळते, ना ते घर खरेदी करू शकतात. काँग्रेसकडे याचे उत्तर नाही, ते फक्त व्होट बँकेचे राजकारण कत आहेत.' 

'मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, या देशातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. CAA नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेस, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि राजेंद्र बाबू इ…या सर्वांनी वचन दिले होते की आम्ही, पाकिस्तान, बांगलादेशा आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या सर्व निर्वासितांना नागरिकत्व देऊ. काँग्रेस पक्षाने ते आश्वासन पूर्ण केले नाही, ते आम्ही पूर्ण करत आहोत. राहुल गांनींचा या ऐतिहासिक कागदपत्रांशी काहीही संबंध नाही. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसBJPभाजपा