शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
3
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
4
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
5
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
6
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
7
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
8
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
9
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
10
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
11
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
12
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
13
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
14
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
15
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
16
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
17
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
18
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
19
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
20
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलात पडून महिला यात्रेकरुचा मृत्यू,८ जखमी; भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:15 IST

अमरनाथ यात्रेदरम्यान मुसळधार पावसामुळे एका महिला यात्रेकरुचा मृत्यू झाला.

Amarnath Yatra Landslide:जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर परिणाम झाला आहे. बुधवारी बालटालच्या रेलपाथरीम्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ८ यात्रेकरू जखमी झाले. तर एका महिलेचा मृत्यू झाला. अतिवृष्टीनंतर शेकडो यात्रेकरूंना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. दुसरीकडे मृत्यू झालेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिखलात कोसळ्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन महिलेला मृत घोषित केले. पावसामुळे अमरनाथ यात्रा आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर झालेल्या भीषण भूस्खलनात एका महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. बालटाल मार्गावरून अमरनाथ गुहेकडे जात असलेले चार यात्रेकरू रेलपाथरी भागात भूस्खलनामुळे खाली कोसळले.जखमींना ताबडतोब बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आले, जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. ५५ वर्षीय  सोना बाई यांचा मृत्यू झाला असून त्या राजस्थानच्या रहिवासी असल्याचे समोर आलं आहे.

आतापर्यंत अमरनाथ यात्रेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. यात्रेकरू ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेकडे जात असताना ही दुर्घटना घडली. हवामान खात्याने या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा दिला होता, ज्यामुळे प्रशासनाने यात्रेकरूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. पाऊस आणि खराब हवामान असूनही यात्रा सुरूच आहे. मात्र या दुर्घटनेनंतर यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेसाठी शोक व्यक्त केला आहे.

ब्रारीमार्ग येथे तैनात असलेल्या लष्कराच्या तुकडीने तातडीने बचाव कार्य सुरू केले. या भागात अडकलेल्या सुमारे ५०० यात्रेकरूंना आश्रय देण्यात आला आणि त्यांना चहा आणि पिण्याचे पाणी देण्यात आले. याशिवाय ब्रारीमार्ग आणि झेड मोर दरम्यानच्या लंगरमध्ये आश्रय घेतलेल्या ३००० इतर यात्रेकरूंना  अन्न देण्यात आले.

दरम्यान, अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली आणि ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या वर्षीही या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. बालटाल आणि पहलगाम मार्गावरून जाणाऱ्या या यात्रेच्या कठीण भागात यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीही मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेकदा यात्रा स्थगित करावी लागली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmarnath Yatraअमरनाथ यात्राRainपाऊस