सांगली : खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील प्रदीप पाटील यांचा मुलगा शौर्य पाटील याने दिल्लीच्या शाळेतील शिक्षकांच्या छळास कंटाळून आत्महत्या केली होती. याचे पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. खासदार विशाल पाटील यांनी याप्रकरणी शाळेच्या चौकशीची मागणी केली.विशाल पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची बाब त्यांनी शासकीय आकडेवारीद्वारे मांडली. ते म्हणाले, शौर्य पाटील याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे शाळेची चौकशी करावी.
वाचा- शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी १२ मार्चला होणारखासगी शाळेतील २५ टक्के जागा या आरटीई कायद्यानुसार भरल्या जातात. ही पद्धत नको असलेल्या शाळा अशा २५ टक्के मुलांचा छळ करतात. त्यामुळे अशा शाळांची चौकशी करावी. कुणी अशा मुलांचा पुन्हा छळ करू नये म्हणून कायदा कडक करावा. शौर्य पाटील हा माझ्या मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील आहे. त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Web Summary : The suicide of Shourya Patil, allegedly due to teacher harassment, resonated in Parliament. MP Vishal Patil demanded an inquiry into the school and stricter laws to protect students from harassment, highlighting rising student suicides in Maharashtra and the RTE quota exploitation.
Web Summary : शिक्षक उत्पीड़न के कारण शौर्य पाटिल की आत्महत्या का मामला संसद में उठा। सांसद विशाल पाटिल ने स्कूल की जांच और छात्रों को उत्पीड़न से बचाने के लिए सख्त कानूनों की मांग की, महाराष्ट्र में छात्र आत्महत्याओं और आरटीई कोटा के शोषण पर प्रकाश डाला।