शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:17 IST

आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे. याच पीएफआयवर पाच दिवसांपूर्वीही देशव्यापी कारवाई करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करावाई करण्यात आली. एनआयए नेतृत्वाखाली विविध तपास संस्थांच्या पथकांनी २२ सप्टेंबर रोजी देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याच्या आणि कट्टरवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून पीएफआयविरुद्ध १५ राज्यांत छापेमारी केली होती. यात संघटनेचे १०६ नेते व कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यात आले होते. पीएफआयचा सहभाग असलेल्या १९ प्रकरणांचा एनआयएकडून तपास सुरू आहे. 

मंगळवारी सात राज्यांच्या पोलिसांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात मंगळवारी छापे टाकले. आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ५७ आणि दिल्लीत ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १० आणि कर्नाटकातही अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

पीएफआय आणि संलग्नित संघटनांनी देशातील विविध ठिकाणी केलेला हिंसाचार व या संघटनेतील सदस्यांच्या वाढत्या राष्ट्रविरोधी कृत्यांच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात स्थानिक पोलीस, विशेष कृती दल (एसटीएफ) आणि दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) यांच्या संयुक्त पथकांनी छापेमारी केली, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. 

लवकरच संघटनेवर बंदी? 

  • पीएफआयची २००६ मध्ये केरळ राज्यात स्थापना केली होती. आपण वंचित गटांच्या सशक्तीकरणासाठी नव सामाजिक चळवळ राबवत असल्याचा पीएफआयचा दावा आहे. 
  • तथापि, पीएफआय इस्लामी कट्टरवादाचा प्रसार करत असल्याचा सुरक्षा संघटनांचा दावा आहे. पीएफआयविरुद्धच्या राष्ट्रव्यापी कारवाईनंतर या संघटनेवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 

घरांमधून कागदपत्रे जप्तपोलीस पथकांनी २६ जिल्ह्यांत एकाच वेळी पीएफआयचे पदाधिकारी व सदस्यांची घरे व प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५७ जणांना ताब्यात घेतले. छाप्यांमध्ये आढळलेली विविध कागदपत्रे व पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, आजच्या कारवाईबद्दल पीएफआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

महाराष्ट्रातून २९ जण ताब्यात

  • राज्यातून पीएफआयशी संबंधित २९ जणांची धरपकड करण्यात आली. यातील काही जणांना न्यायालयात हजर करुन नंतर सोडून देण्यात आले.  औरंगाबादमधून सर्वाधिक १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. 
  • त्यातील १० जणांवर शहर पोलिसांनी १०७ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. उर्वरित चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० दिवसांसाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. 
  • ठाण्यातून चार, पुण्यातून सहा, अहमदनगरमधून दोन, तर जळगाव, मिरज आणि नवी मुंबई येथून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रAssamआसाम