शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:17 IST

आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे. याच पीएफआयवर पाच दिवसांपूर्वीही देशव्यापी कारवाई करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करावाई करण्यात आली. एनआयए नेतृत्वाखाली विविध तपास संस्थांच्या पथकांनी २२ सप्टेंबर रोजी देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याच्या आणि कट्टरवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून पीएफआयविरुद्ध १५ राज्यांत छापेमारी केली होती. यात संघटनेचे १०६ नेते व कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यात आले होते. पीएफआयचा सहभाग असलेल्या १९ प्रकरणांचा एनआयएकडून तपास सुरू आहे. 

मंगळवारी सात राज्यांच्या पोलिसांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात मंगळवारी छापे टाकले. आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ५७ आणि दिल्लीत ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १० आणि कर्नाटकातही अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

पीएफआय आणि संलग्नित संघटनांनी देशातील विविध ठिकाणी केलेला हिंसाचार व या संघटनेतील सदस्यांच्या वाढत्या राष्ट्रविरोधी कृत्यांच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात स्थानिक पोलीस, विशेष कृती दल (एसटीएफ) आणि दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) यांच्या संयुक्त पथकांनी छापेमारी केली, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. 

लवकरच संघटनेवर बंदी? 

  • पीएफआयची २००६ मध्ये केरळ राज्यात स्थापना केली होती. आपण वंचित गटांच्या सशक्तीकरणासाठी नव सामाजिक चळवळ राबवत असल्याचा पीएफआयचा दावा आहे. 
  • तथापि, पीएफआय इस्लामी कट्टरवादाचा प्रसार करत असल्याचा सुरक्षा संघटनांचा दावा आहे. पीएफआयविरुद्धच्या राष्ट्रव्यापी कारवाईनंतर या संघटनेवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 

घरांमधून कागदपत्रे जप्तपोलीस पथकांनी २६ जिल्ह्यांत एकाच वेळी पीएफआयचे पदाधिकारी व सदस्यांची घरे व प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५७ जणांना ताब्यात घेतले. छाप्यांमध्ये आढळलेली विविध कागदपत्रे व पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, आजच्या कारवाईबद्दल पीएफआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

महाराष्ट्रातून २९ जण ताब्यात

  • राज्यातून पीएफआयशी संबंधित २९ जणांची धरपकड करण्यात आली. यातील काही जणांना न्यायालयात हजर करुन नंतर सोडून देण्यात आले.  औरंगाबादमधून सर्वाधिक १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. 
  • त्यातील १० जणांवर शहर पोलिसांनी १०७ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. उर्वरित चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० दिवसांसाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. 
  • ठाण्यातून चार, पुण्यातून सहा, अहमदनगरमधून दोन, तर जळगाव, मिरज आणि नवी मुंबई येथून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रAssamआसाम