शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:17 IST

आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे. याच पीएफआयवर पाच दिवसांपूर्वीही देशव्यापी कारवाई करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करावाई करण्यात आली. एनआयए नेतृत्वाखाली विविध तपास संस्थांच्या पथकांनी २२ सप्टेंबर रोजी देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याच्या आणि कट्टरवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून पीएफआयविरुद्ध १५ राज्यांत छापेमारी केली होती. यात संघटनेचे १०६ नेते व कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यात आले होते. पीएफआयचा सहभाग असलेल्या १९ प्रकरणांचा एनआयएकडून तपास सुरू आहे. 

मंगळवारी सात राज्यांच्या पोलिसांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात मंगळवारी छापे टाकले. आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ५७ आणि दिल्लीत ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १० आणि कर्नाटकातही अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

पीएफआय आणि संलग्नित संघटनांनी देशातील विविध ठिकाणी केलेला हिंसाचार व या संघटनेतील सदस्यांच्या वाढत्या राष्ट्रविरोधी कृत्यांच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात स्थानिक पोलीस, विशेष कृती दल (एसटीएफ) आणि दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) यांच्या संयुक्त पथकांनी छापेमारी केली, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. 

लवकरच संघटनेवर बंदी? 

  • पीएफआयची २००६ मध्ये केरळ राज्यात स्थापना केली होती. आपण वंचित गटांच्या सशक्तीकरणासाठी नव सामाजिक चळवळ राबवत असल्याचा पीएफआयचा दावा आहे. 
  • तथापि, पीएफआय इस्लामी कट्टरवादाचा प्रसार करत असल्याचा सुरक्षा संघटनांचा दावा आहे. पीएफआयविरुद्धच्या राष्ट्रव्यापी कारवाईनंतर या संघटनेवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 

घरांमधून कागदपत्रे जप्तपोलीस पथकांनी २६ जिल्ह्यांत एकाच वेळी पीएफआयचे पदाधिकारी व सदस्यांची घरे व प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५७ जणांना ताब्यात घेतले. छाप्यांमध्ये आढळलेली विविध कागदपत्रे व पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, आजच्या कारवाईबद्दल पीएफआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

महाराष्ट्रातून २९ जण ताब्यात

  • राज्यातून पीएफआयशी संबंधित २९ जणांची धरपकड करण्यात आली. यातील काही जणांना न्यायालयात हजर करुन नंतर सोडून देण्यात आले.  औरंगाबादमधून सर्वाधिक १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. 
  • त्यातील १० जणांवर शहर पोलिसांनी १०७ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. उर्वरित चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० दिवसांसाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. 
  • ठाण्यातून चार, पुण्यातून सहा, अहमदनगरमधून दोन, तर जळगाव, मिरज आणि नवी मुंबई येथून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रAssamआसाम