शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 01:31 IST

भारत प्रथम हेच ध्येय; देशभरात मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन; धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची घेतली शपथ

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा १३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करताना भारत प्रथम हेच आमचे ध्येय, अशी घोषणा देत देशाचे ऐक्य, अखंडता, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची शपथ घेतली. देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये, तसेच अनेक शहरांत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.दिल्लीतील कार्यक्रमास पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, ए. के. अँथनी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर नेत्यांनी टीका केली. देशात अस्थैर्य, आर्थिक संकट व भयाचे वातावरण मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. लखनौमध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील पक्षाच्या योगदानाचा आणि स्वातंत्र्योत्तर काळात पक्षाने देशात घडवून आणलेल्या सुधारणांचा आवर्जून उल्लेख केला. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार देशाला अंधाराकडे नेऊ पाहत आहे. देशातील गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केरळमध्येही मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच रमेश चेन्नीतला यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेन्नई, पुडुचेरी, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, पाटणा, चंदीगड, रांची येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या. यंदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह दिसत होता आणि सर्व ठिकाणी काँग्रेस नेते आवर्जून हजर होते.राजस्थानच्या जयपूरमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट सहभागी झाले होते, तर भोपाळमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, रायपूरमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यात भाग घेतला.नोटाबंदीपेक्षा सीएए भयंकरआसाममध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा गरिबांचे व आदिवासी भटक्या व विमुक्तांचे अधिकार काढून घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकार नोटाबंदीपेक्षाही भयंकर प्रकार करू पाहत आहे. लोकांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष यशस्वी होऊ देणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीManmohan Singhमनमोहन सिंगPriyanka Gandhiप्रियंका गांधी