शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 01:31 IST

भारत प्रथम हेच ध्येय; देशभरात मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन; धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची घेतली शपथ

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा १३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करताना भारत प्रथम हेच आमचे ध्येय, अशी घोषणा देत देशाचे ऐक्य, अखंडता, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची शपथ घेतली. देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये, तसेच अनेक शहरांत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.दिल्लीतील कार्यक्रमास पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, ए. के. अँथनी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर नेत्यांनी टीका केली. देशात अस्थैर्य, आर्थिक संकट व भयाचे वातावरण मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. लखनौमध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील पक्षाच्या योगदानाचा आणि स्वातंत्र्योत्तर काळात पक्षाने देशात घडवून आणलेल्या सुधारणांचा आवर्जून उल्लेख केला. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार देशाला अंधाराकडे नेऊ पाहत आहे. देशातील गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केरळमध्येही मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच रमेश चेन्नीतला यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेन्नई, पुडुचेरी, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, पाटणा, चंदीगड, रांची येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या. यंदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह दिसत होता आणि सर्व ठिकाणी काँग्रेस नेते आवर्जून हजर होते.राजस्थानच्या जयपूरमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट सहभागी झाले होते, तर भोपाळमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, रायपूरमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यात भाग घेतला.नोटाबंदीपेक्षा सीएए भयंकरआसाममध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा गरिबांचे व आदिवासी भटक्या व विमुक्तांचे अधिकार काढून घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकार नोटाबंदीपेक्षाही भयंकर प्रकार करू पाहत आहे. लोकांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष यशस्वी होऊ देणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीManmohan Singhमनमोहन सिंगPriyanka Gandhiप्रियंका गांधी