शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 01:31 IST

भारत प्रथम हेच ध्येय; देशभरात मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन; धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची घेतली शपथ

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा १३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करताना भारत प्रथम हेच आमचे ध्येय, अशी घोषणा देत देशाचे ऐक्य, अखंडता, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची शपथ घेतली. देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये, तसेच अनेक शहरांत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.दिल्लीतील कार्यक्रमास पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, ए. के. अँथनी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर नेत्यांनी टीका केली. देशात अस्थैर्य, आर्थिक संकट व भयाचे वातावरण मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. लखनौमध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील पक्षाच्या योगदानाचा आणि स्वातंत्र्योत्तर काळात पक्षाने देशात घडवून आणलेल्या सुधारणांचा आवर्जून उल्लेख केला. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार देशाला अंधाराकडे नेऊ पाहत आहे. देशातील गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केरळमध्येही मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच रमेश चेन्नीतला यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेन्नई, पुडुचेरी, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, पाटणा, चंदीगड, रांची येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या. यंदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह दिसत होता आणि सर्व ठिकाणी काँग्रेस नेते आवर्जून हजर होते.राजस्थानच्या जयपूरमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट सहभागी झाले होते, तर भोपाळमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, रायपूरमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यात भाग घेतला.नोटाबंदीपेक्षा सीएए भयंकरआसाममध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा गरिबांचे व आदिवासी भटक्या व विमुक्तांचे अधिकार काढून घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकार नोटाबंदीपेक्षाही भयंकर प्रकार करू पाहत आहे. लोकांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष यशस्वी होऊ देणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीManmohan Singhमनमोहन सिंगPriyanka Gandhiप्रियंका गांधी