Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:18 IST2025-06-08T15:18:11+5:302025-06-08T15:18:44+5:30
Monsoon Update : मागील काही दिवसांपासून देशभरात वळवाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली.

Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
Monsoon Update : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण, जून महिन्याची आठ तारीख आली पण अजूनही अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि वायव्य भारतात सुमारे एक आठवडा उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, पुढील पाच दिवसांत दिल्लीत तापमानाचा पारा ३-४ अंश सेल्सिअसने वाढेल. शनिवारी येथील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते.ॉ
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
'मान्सून'बाबत मोठी अपडेट
गेल्या एका आठवड्यापासून मान्सून पुढे गेलेला नाही. कोरड्या हवेच्या अडथळ्यामुळे २९ मे पासून मान्सून पुढे गेलेला नाही. आता १२ ते १८ जून या आठवड्यात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे. देशातील अनेक भागांमध्ये अजूनही तेवढी उष्णता झालेली नाही. याचे कारण नैऋत्य मान्सूनचे लवकर आगमन आहे. साधारणपणे जूनच्या अखेरीस मान्सून देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतो. तो ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो. दिल्लीत मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणपणे २७ जून असते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन म्हणाले की, १२ जूनपर्यंत मान्सून खूपच कमकुवत राहील. याचे कारण कमकुवत मान्सूनचा प्रवाह आणि वायव्य दिशेकडून कोरड्या हवेचा प्रवेश आहे. आता मान्सूनच्या प्रगतीदरम्यान बराच विराम दिसून आला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा पुढे सरकेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विविध राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे . यामध्ये पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानचा समावेश आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असले तरी, पुढील चार ते पाच दिवसांत ते बदलेल. राजस्थानमध्ये ९ जूनपासून आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात १० जूनपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.