शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

देशात पावसाचा कहर; 1900 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 09:27 IST

भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 1900 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 1900 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 22 राज्यांमध्ये जवळपास 25 लाखांहून अधिक लोकांना पाऊस आणि पुराचा फटका बसला.महाराष्ट्रात 382 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - तब्बल चार महिने देशासह राज्यात ठिकठिकाणी धिंगाणा घातलेल्या मान्सूनचा तडाखा अद्यापही नागरिकांना बसत आहे. भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 1900 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मान्सूनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 1900 जणांना जीव गमवावा लागला आहे तर 46 जण बेपत्ता आहेत. यंदा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 22 राज्यांमध्ये जवळपास 25 लाखांहून अधिक लोकांना पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. भूस्‍खलनच्या समस्येचाही सामना करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 382 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पूर आणि वीज पडल्याने 227 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण 357 जिल्ह्यांना यावर्षी पावसाळ्यात पूर व दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांचा सामना करावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे 738 लोक जखमी झाले आहेत. तर सुमारे 20 हजार जनावरे मृत्युमुखी पडली. पाऊस व पुरांमुळे 1.09 लाख घरे पडली आणि 2.05 लाख घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरांमुळे तब्बल 14.14 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकेही नष्ट झाली आहेत. 30 सप्टेंबर रोजी अधिकृतरीत्या मान्सून संपत असला, तरी अद्याप देशातील काही भागांमध्ये अद्याप मान्सून सक्रिय आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सर्वसाधारणपणे कोरडे हवामान होते. मात्र, शुक्रवारी (4 ऑक्टोबर) सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. पहाटे साडेआठ ते साडेअकरा दरम्यान तीन तासांत मुंबईत 13 मिमी पाऊस पडला. पुढील एक आठवडाभर मुंबईत पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कारण चक्रवाती परिस्थिती तामिळनाडूवर असून, तेथून उत्तर आणि गोवा आणि कोकण विभागात हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. येते काही दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात निरंतर पाऊस सुरू राहील. 8 ऑक्टोबरच्या सुमारास, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लगतच्या भागात चक्रवाती परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसात वाढ होईल. कोकण आणि गोव्यातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू