शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

"जर तेथील हिंदू...!"; बांगलादेशी हिंदूंसंदर्भात मोहन भागवत यांचा इशारा, अवैध स्थलांतरितांसंदर्भातही मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 21:08 IST

भागवत पुढे म्हणाले, "नागरिकांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना ओळखावे आणि तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी. एवढेच नाही तर, अशा लोकांना कोणीही कामावर ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेली केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सद्यस्थितीसंदर्भात रविवारी मोठा इशारा दिला. मुंबईतील ‘संघाची १०० वर्षांची वाटचाल: नवी क्षितिजे’ या व्याख्यानमालेत बोलताना भागवत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठे विधान केले आहे.

भागवत म्हणाले, बांगलादेशात सुमारे १.२५ कोटी हिंदू आहेत. जर तेथील हिंदू आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी जागृत झाले, तर संपूर्ण जगातील हिंदू या लढ्यात त्यांच्या मदतीसाठी धावून येतील. त्यांना एकत्र यावे लागेल. ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निर्वासनानंतर, बांगलादेशातील वातावरण तणावपूर्णच आहे. त्यातच गेल्या डिसेंबर महिन्यात विद्यार्थी नेता उस्मान हादीच्या हत्येनंतर तेथील परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अवैध स्थलांतरितांसंदर्भात कठोर भूमिका आवश्यक -भागवत पुढे म्हणाले, "नागरिकांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना ओळखावे आणि तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी. एवढेच नाही तर, अशा लोकांना कोणीही कामावर ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेली केले.

एसआयआर (SIR) प्रक्रियेचा उल्लेख करत ते म्हणाले, "सरकारला अवैध स्थलांतर रोखण्यासाठी मोठी पावले उचलावी लागतील. अवैध लोकांची ओळख पटवून त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याची (डिपोर्ट) ही प्रक्रिया सध्या हळूहळू सुरू झाली  आहे. भविष्यात ही मोहीम अधिक तीव्र होईल, असा विश्वासही त्यांनी यावेली व्यक्त केला.

"देश एकदाच तुटला, जेव्हा..." -तत्पूर्वी शनिवारच्या सत्रात बोलताना भागवत म्हणाले होते, "आपल्या देशात इस्लामच्या आक्रमानाबरोबर मुस्लीम आले. अद्यापपर्यंत आहेत. त्यांचा इस्लाम गेला नाही. आपल्या बोरोबर आहेत. ख्रिश्चन आले. त्यांची ख्रिश्चनिटी कायम आहे. आपसात खूट-खूट होत राहते. मात्र, देश तुटला असे कधी झाले नाही. एकदाच तुटला, जेव्हा  ‘हिंदू भावाचे विस्मरण झाले".

हिंदुत्व सुरक्षिततेची हमी देते -भागवत म्हणाले, "हिंदू असण्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने त्यांचा धर्म पाळणे थांबवावे. हिंदुत्व स्वीकारल्याने तुम्ही काहीही गमावत नाही, तुमच्या धार्मिक पद्धती किंवा तुमची भाषाही गमावत नाही. हिंदुत्व तुमच्या सुरक्षिततेची हमी देते. भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता.

भागवत पुढे म्हणाले, हिंदू-मुस्लिम ऐक्य हा चुकीचा वाक्यांश आहे कारण तुम्ही दोन (वेगळ्या) लोकांना एकत्र करत आहात, जे आधीच एक आहेत त्यांना नाही. ते म्हणाले की आरएसएस समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि संघटनेचे स्वरूप धारणा आणि प्रचाराच्या आधारे समजले जाऊ शकत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagwat warns on Bangladeshi Hindus, calls for action on illegal immigrants.

Web Summary : Mohan Bhagwat raised concerns about the safety of Hindus in Bangladesh, urging them to fight for rights with global Hindu support. He stressed identifying illegal immigrants, advocating strict action and deportation, highlighting the need for societal unity beyond religious differences.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBangladeshबांगलादेश