शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:45 IST

केंद्र सरकारने आणलेल्या 'अग्निवीर' योजनेवरुन राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. यातून ते सातत्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. भाजपला संविधान आणि लोकशाही नष्ट करायची आहे, असा आरोप करत राहुल गांधींनी केंद्राच्या अग्निवीर योजनेवरही हल्लाबोल केला.

राहुल गांधींनी आज हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा अग्निवीर योजनेला विरोध केला. या योजनेवर राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या केंद्र सरकारने भारतातील सैनिकांना मजूर बनवले आहे. या नवीन धोरणामुळे आता देशात दोन प्रकारचे सैनिक निर्माण होतील. एक सैनिक ज्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल, त्याला शहीदाचा दर्जाही मिळेल आणि दुसरा सैनिक ज्याच्या कुटुंबाला या योजनेत काहीही मिळणार नाही. 

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्वात आधी ही अग्निवीर योजना बंद केली जाईल. आमचे सरकार सर्वांना समान सुरक्षा देईल. सर्वांना समान सुविधा मिळतील. सैन्यात कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. शहीदांचा एकच प्रकार असेल. त्याच प्रकारच्या सेवाशर्ती लागू होतील. सर्व कुटुंबांना काही ना काही पेन्शन मिळेल, प्रत्येकाला शहीदाचा दर्जा मिळेल, असे आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, मी भारत जोडो यात्रात देशभरात हजारो किलोमीटरचा प्रवास केला. मला हजारो लोक भेटले आणि त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर खुलेपणाने आपले म्हणने मांडले. मात्र सध्याच्या सरकारला महागाई आणि बेरोजगारीशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAgneepath Schemeअग्निपथ योजना