शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:45 IST

केंद्र सरकारने आणलेल्या 'अग्निवीर' योजनेवरुन राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. यातून ते सातत्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. भाजपला संविधान आणि लोकशाही नष्ट करायची आहे, असा आरोप करत राहुल गांधींनी केंद्राच्या अग्निवीर योजनेवरही हल्लाबोल केला.

राहुल गांधींनी आज हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा अग्निवीर योजनेला विरोध केला. या योजनेवर राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या केंद्र सरकारने भारतातील सैनिकांना मजूर बनवले आहे. या नवीन धोरणामुळे आता देशात दोन प्रकारचे सैनिक निर्माण होतील. एक सैनिक ज्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल, त्याला शहीदाचा दर्जाही मिळेल आणि दुसरा सैनिक ज्याच्या कुटुंबाला या योजनेत काहीही मिळणार नाही. 

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्वात आधी ही अग्निवीर योजना बंद केली जाईल. आमचे सरकार सर्वांना समान सुरक्षा देईल. सर्वांना समान सुविधा मिळतील. सैन्यात कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. शहीदांचा एकच प्रकार असेल. त्याच प्रकारच्या सेवाशर्ती लागू होतील. सर्व कुटुंबांना काही ना काही पेन्शन मिळेल, प्रत्येकाला शहीदाचा दर्जा मिळेल, असे आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, मी भारत जोडो यात्रात देशभरात हजारो किलोमीटरचा प्रवास केला. मला हजारो लोक भेटले आणि त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर खुलेपणाने आपले म्हणने मांडले. मात्र सध्याच्या सरकारला महागाई आणि बेरोजगारीशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAgneepath Schemeअग्निपथ योजना