शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मोदी सरकारकडून १० हजार कोटींची ‘आयुष्यमान सहकार योजना’ जाहीर; ग्रामीण भागाला मोठा फायदा

By प्रविण मरगळे | Updated: October 20, 2020 09:17 IST

सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान सहकार योजनेंतर्गत सहकारी संस्थांना ग्रामीण भागातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १०,००० कोटी रुपयांची कर्जे देईलदेशातील जवळपास ५२ रुग्णालये सहकारी संस्था चालवित आहेत. या रुग्णालयांमध्ये बेडची संख्या ५ हजारसहकारी रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षण सुरू करण्यास मदत करेल

नवी दिल्ली. आयुष्यमान भारतच्या धर्तीवर ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने 'आयुष्यमान सहकार' योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा (Healthcare) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देईल.

सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान सहकार योजनेंतर्गत सहकारी संस्थांना ग्रामीण भागातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोमवारी आयुष्यमान सहकार या नवीन योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १०,००० कोटी रुपयांची कर्जे देईल. एनसीडीसीचे व्यवस्थापकीय संपादक संदीप नायक म्हणाले की, देशातील जवळपास ५२ रुग्णालये सहकारी संस्था चालवित आहेत. या रुग्णालयांमध्ये बेडची संख्या ५ हजार आहे.

या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध असतील

'आयुष्यमान सहकार योजना' ग्रामीण भागातील रुग्णालयांची स्थापना, आधुनिकीकरण, विस्तार, दुरुस्ती, नूतनीकरण, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांचा समाविष्ट करेल. हे सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षण सुरू करण्यास मदत करेल. योजनेच्या आवश्यकतेनुसार कार्यशील भांडवल आणि मार्जिन मनी देखील प्रदान करेल. ही योजना महिलांचा जास्त समावेश असणाऱ्या सहकारी संस्थांना एक टक्का व्याज सूट उपलब्ध करुन देईल.

तसेच एनसीडीसी फंडाद्वारे सहकारी संस्थांच्या आरोग्य सेवेच्या तरतूदीस प्रोत्साहित केले जाईल. आरोग्य सेवेसाठी योग्य तरतूद असलेल्या सहकारी संस्थांना एनसीडीसीकडून कर्ज मिळू शकेल, असे सरकारने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एनसीडीसीकडून ही आर्थिक मदत राज्य सरकारमार्फत किंवा थेट पात्र सहकारी संस्थांना दिली जाईल.

शेतकरी कल्याणाच्या दिशेने अजून एक पाऊल

व्हर्चुअल मार्गाने ही योजना सुरू केल्यानंतर रूपाला यांनी सांगितले की सध्याच्या कोरोना महामारीमुळे अशाप्रकारच्या आरोग्य सुविधांची गरज भासू लागली आहे. एनसीडीसीची योजना ही केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांच्या कल्याणाच्या एक पाऊल आहे. देशभर आणि विशेषत: ग्रामीण भागात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. सहकारी शेतकरी दुग्ध उत्पादनातून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी काही सहकारी संस्था रुग्णालये देखील चालवतात.

टॅग्स :Healthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकारhospitalहॉस्पिटलayushman bharatआयुष्मान भारत