शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मोदी सरकारच्या जन धनसारख्या 'या' पाच मोठ्या योजनांनी गरिबांना दिला आधार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 10:01 IST

योजनांमुळे देशातील शेवटच्या रांगेत असलेल्या गरिबांच्या जीवनात मोठे बदल झाले

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी गरिबांना आधार दिला आहे. ५ किलो तांदूळ मोफत देण्यासारखा चांगला निर्णय मोदी सरकारनं घेतला. तसेच मोदी सरकारनं गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या, त्या योजनांमुळे कोरोनाच्या संकटातही गरिबांना आधार मिळाला आहे. जनधन योजनेपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणातही मोदी सरकारनं आमूलाग्र बदल केले आहेत. आता नरेंद्र मोदींच्या 5 मोठ्या योजनांबद्दल माहिती जाणून घेऊयात. या योजनांमुळे देशातील शेवटच्या रांगेत असलेल्या गरिबांच्या जीवनात मोठे बदल झाले आणि या सर्व योजना अशा होत्या, ज्यात पंतप्रधानांचा वरचष्मा दिसून येत होता.उज्ज्वला योजनाकेंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेने दुर्बल घटकातील कुटुंबांना, विशेषत: महिलांना खूप दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे 1 मे 2016ला ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीएमयूवाय अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरगुती एलपीजी (LPG) कनेक्शन देण्यात आले.प्रधानमंत्री जन धन योजनापंतप्रधान जन धन योजना मोदी सरकारची गेमचेंजर योजना म्हणूनही पाहिली जाते. ही योजना 28 ऑगस्ट 2014ला सुरू केली गेली. या योजनेंतर्गत देशातील गरीब लोकांची पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शून्य शिल्लक खाती उघडली गेली. ही खाती आधार कार्डशी जोडली गेली. त्याचा फायदा म्हणजे केंद्राच्या योजनांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात पाठविले जात आहे, तसेच या योजनेंतर्गत लोकांना एक लाख रुपयांचा अपघात विमा योजनेची सुविधादेखील पुरविली गेली.आयुष्मान भारत योजनादेशातील गरीब नागरिकांना चांगले आरोग्य सेवा मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना आणली. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा प्रदान करते आणि त्यांना त्याचा मोबदला देते, जेणेकरून त्यांना रुग्णालयात गंभीर आजारावर मोफत उपचार मिळतील. या योजनेंतर्गत शासकीय संचालित विविध सरकारी रुग्णालये समाविष्ट करण्यात आली असून, 1350 सूचीबद्ध आजारांवर उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी)या योजनेचे उद्दिष्ट हे सर्व निम्न वर्ग, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय लोकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. वर्ष 2022पर्यंत सर्व लाभार्थी योजनेंतर्गत येतील. ही योजना ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) म्हणून ओळखली जाते.राष्ट्रीय शिक्षण धोरणदेशाचे शिक्षण धोरण कालबाह्य झाले होते, अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणात मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी नवीन शिक्षण धोरण आणले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारत