शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मोदी सरकारकडून लोकांना पाठवले जातायत व्हॉट्सॲप मेसेज, काँग्रेस पक्ष भडकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 16:40 IST

"सरकारकडून पाठवण्यात येत असलेल्या या मेसेसोबत पंतप्रधान मोदींचे एक पत्रही आहे..."

आपल्याला सरकारकडून व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला असेल? सरकार 'विकासित भारत संपर्क' नावाच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून लोकांच्या मोबाईलवर हा मेसेज पाठवून फीडबॅक मागवत आहे. मात्र आता, या मेसेजवरून राजकीय वादही सुरू झाला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही भाजप आपल्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सरकारकडून पाठवण्यात येत असलेल्या या मेसेसोबत पंतप्रधान मोदींचे एक पत्रही आहे. सरकारच्या डेटाबेसचा वापर करून राजकीय प्रचार केला जात असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या केरळ युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटाला टॅग करत म्हटले आहे की, विकसित भारत संपर्क नावाच्या व्हेरिफाइड बिझनेस अकाउंटवरून लोकांना मेसेज पाठवला जात आहेत. या मेसेजमध्ये लोकांकडून फिडबॅक मागवला जात आहे. यासोबत जोडलेले पीएम मोदींचे पत्र राजकीय प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. या माध्यमातून पंतप्रधान मोदी आपल्या पक्षाचा प्रचार करत असून सरकारी डेटाबेसचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपचाही राजकारणासाठी गैरवापर होत आहे.

केरळ काँग्रेसने सरकारच्या पॉलिसीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यात, कंपनी कुठलाही राजकीय पक्ष, राजकारणी, राजकीय उमेदवार अथवा राजकीय प्रचारासाठी मेसेजिंग ॲप वापरण्यास कंपनीची मनाई आहे, असे म्हणण्यात आले आहे. यावर, ही कंपनीची पॉलिसी असेल तर, एका राजकीय नेत्याला प्रचारासाठी हा प्लॅटफॉर्म का देण्यात आला? की भाजपसाठी आपले काही वेगळे धोरण आहे? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक पत्र जारी करत विकसित भारतासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमची साथ आणि तुमच्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे या योजनांसंदर्भात आपले मत नोंदवावे ही विनंती, असे या मेसेजमध्ये म्हणण्यात आले आहे. 2047 पर्यंत देशाचा विकास करण्याचे स्वप्न दाखवणे हीं भाजपची राजकीय खेळी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप