शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

मोदी सरकारमधील 'या' मंत्र्यांना आणीबाणीच्या काळात भोगावा लागला तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:14 PM

 देशाचे विद्यमान  रक्षामंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथसिंह यांच्याकडे आणीबाणीच्या काळात भाजपची मिर्जापूर जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली होती.

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या  आणीबाणीच्या घटनेला ४४ वर्षेपूर्ण झाली आहेत. या ४४ वर्षांच्या  काळात आज देशात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या  अनेक बदल झाले आहे. आणीबाणीच्या काळात ज्या युवा नेत्यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आणीबाणीला विरोध केला होता,त्या नेत्यांना त्याचा मोबदला म्हणून आज सत्तेत जागा मिळाली मिळाली आहे. विशेष म्हणजे या नेत्यांनी  रस्तावर उतरून आणीबाणीच्या काळात सरकार विरोधात आंदोलने केली होती , त्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा  भोगावा लागला होता.

 देशाचे विद्यमान  रक्षामंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथसिंह यांच्याकडे आणीबाणीच्या काळात भाजपची मिर्जापूर जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली होती. या काळात त्यांनी आणीबाणीला प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे त्यांना १८ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता. तर याचवेळी आताचे कायदे व माहिती तंत्रज्ञान मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांना सुद्धा तुरुंगात जावे लागले  होते. त्यावेळी ते पटना विद्यापीठात अखिल भारतीय  विद्यार्थी परिषद  संघटनेचे कार्यकर्ते होते.

आत्ताच्या मोदी सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहलोत हे आणीबाणीच्या काळात आरएसएस संघटनेत कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याकडे नगदा जंक्शन येथील संघटनेची मुख्य संयोजक पदाची जवाबदारी देण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात विरोध केला म्हणून तत्कालीन सरकारने गेहलोत यांना १० महिने तुरुंगात ठेवले होते.

या बरोबरच, विद्यमान कामगार मंत्री संतोष गंगवार ह्यांना सुद्धा आणीबाणीला विरोध केला म्हणून तुरुंगात जावे लागले होते. तसेच, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि ग्राहक व्यवहार व अन्न, सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांना सुद्धा त्यावेळी १८ महिने कारागृहात काढावे लागले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनी चौबे यांना सुद्धा सरकारने जेलमध्ये टाकले होते . तर कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी ५ महिने तुरुंगात काढले होते. या वेतिरिक्त केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना सुद्धा आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता.