शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शेतातून सत्तेचा मार्ग! लोकसभेच्या परीक्षेसाठी मोदी सरकारचा 'तेलंगणा पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:02 AM

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी नवी योजना आणण्याचा विचार

हैदराबाद: हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर आता मोदी सरकार नवी योजना लागू करण्याच्या विचारात आहे. शेतकऱ्यांना एकरामागे काही ठराविक रक्कम देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळामुळे शेतकरी काहीशा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा देऊन शेतातून सत्तेत जाण्याची योजना मोदी सरकारकडून आखली जात आहेत. विशेष म्हणजे या योजनेची प्रेरणा केंद्र सरकारला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून मिळाली आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र यामध्ये तेलंगणाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. तेलंगणातील केसीआर सरकारनं 'रयत बंधू' योजना राबवल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. याच योजनेच्या जोरावर केसीआर यांनी तेलंगणातील दणदणीत विजयासह पुन्हा सत्ता मिळवली. मात्र याचवेळी भाजपाला छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशातील सत्ता गमवावी लागली. आगामी निवडणूक जिंकून सत्ता राखण्यासाठी मोदी सरकार सध्या केसीआर यांनी राबवलेल्या योजनेचा गंभीरपणे विचार करत आहे. 2018 मध्ये केसीआर यांनी रयत बंधू योजना राबवली. शेतकऱ्यांना थेट रोख रकमेच्या माध्यमातून मदत करणारी ही देशातील पहिलीच योजना होती. याचा फायदा तेलंगणातील 57 लाख शेतकऱ्यांना झाला. या योजनेच्या माध्यमातून पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्याला एकरी 4 हजार रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे ही मदत मिळवण्यासाठी पीक घ्यायलाच हवं, अशी अट नव्हती. या योजनेमुळे शेतकऱ्याला वर्षभरात एकरामागे 8 हजार रुपये मिळाले. यामुळे तेलंगणाच्या तिजोरीवर जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा बोजा पडला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीTelanganaतेलंगणा