मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 21:36 IST2025-12-12T21:35:19+5:302025-12-12T21:36:02+5:30

मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे...

Modi government changed the name of 'MGNREGA', now the scheme will be known as poojya bapu grameen rozgar yojna Benefits have also increased | मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल

मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल


केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा - MGNREGA) योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' नावाने ओळखली जाईल. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेचे नाव बदलण्यास आणि कामाचे दिवस वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

१०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी -
मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. अर्थात, आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे.

योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रिय -
मनरेगा ही यूपीए-१ (UPA-I) सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक असून, २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील कुटुंबांना उपजीविकेची सुरक्षा पुरवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रियपणे काम करत आहेत, यात सुमारे एक-तृतीयांश महिलांचा समावेश आहे. 

सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे होते, यानंतर २००९ मध्ये या योजनेचे नाव बदलून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' असे करण्यात आले होते. आता या महत्त्वपूर्ण योजनेला 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' म्हणून ओळखले जाईल आणि १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळेल. 

Web Title : मनरेगा का नाम बदला, कार्य दिवस बढ़े: मोदी सरकार की नई योजना

Web Summary : केंद्र सरकार ने मनरेगा का नाम बदलकर 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' कर दिया और गारंटीकृत कार्य दिवसों को 100 से बढ़ाकर 125 कर दिया। इस बदलाव का उद्देश्य ग्रामीण परिवारों को अधिक आजीविका सुरक्षा प्रदान करना है, जिससे 15 करोड़ से अधिक सक्रिय श्रमिकों को लाभ होगा, जिनमें बड़ी संख्या में महिलाएं भी शामिल हैं।

Web Title : MGNREGA Renamed, Workdays Increased: Modi Government's New Scheme

Web Summary : The central government renamed MGNREGA to 'Poojya Bapu Gramin Rozgar Yojana' and increased guaranteed workdays from 100 to 125. This change aims to provide more livelihood security to rural families, benefiting over 15 crore active workers, including a significant number of women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.