शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक बातमी वाचली अन् मोदींना 'आयडिया' सुचली, दिली तब्बल 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:33 IST

या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची, असं मोदींनी सांगितलं.

ठळक मुद्देया योजनेंतर्गत 25 कामे निवडण्यात आली आहेत. या योजनेतून गावातील प्रत्येक गरज पूर्ण केली जाऊ शकते.देशातील 116 जिल्ह्यांत योजनेची सुरुवातया योजनेंतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घराच्या जवळच रोजगार मिळेल.

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुसऱ्या राज्यांतून परतलेल्या स्थलांतरित मजुरांना, त्यांच्या घराच्या जवळपासच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 50,000 कोटी रुपयांनिशी 'गरीब कल्याण रोजगार अभियानाला'  सुरुवात केली. ही योजना बिहार राज्यातल्या खगडिया जिल्यातील बेलदौर भागातील तेलिहार गावातून सुरू करण्यात आली आहे. स्थलांतरित आणि गावातील मजुरांना सशक्त बनवणे, स्थानिक पातळीवर विकासाला गती देणे आणि उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेमाकचा मुख्य हेतू आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना या अभियानाची कल्पना कशी सुचली, हेही सांगितले. 

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी लॉकडाउनदरम्यान एक बातमी बघितली, ही बातमी उत्तर प्रदेशातल्या उन्नावची होती. तेथे एका शाळेचे रुपांतर क्वारंटाइन सेन्टरमध्ये करण्यात आले होते. येथे शहरांतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. यावेळी अधिकांश मजूर हे दक्षीण भारतातून आले होते. हे मजूर रंग-रंगोटी आणि पीओपीच्या कामात अत्यंत एक्सपर्ट होते. मात्र, क्वारंटाइन होते. आपल्या गावासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. हे मजूर म्हणाले, दोन वेळ खाऊन फक्त बसण्यापेक्षा, आम्हाला जे येते, त्याचा उपयोग करून घ्या, ते काम आमच्याकडून करून घ्या. यानंतर या मजूर भावंडांनी क्वारंटाइनमध्ये असतानाच संपूर्ण शाळेचा कायाकल्प करून टाकला. 

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची. गावातील मजुरांमध्ये एवढा कौशल्य आहे, त्यांचे हेच कौशल्य आणि श्रम गावाच्या कामी आले, तर गावांचा कायाकल्प होईल. यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत 25 कामे निवडण्यात आली आहेत. या योजनेतून गावातील प्रत्येक गरज पूर्ण केली जाऊ शकते.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

देशातील 116 जिल्ह्यांत योजनेची सुरुवात -पंतप्रधानांनी व्हिडिओ कॅन्फरन्सिंगच्या माध्यमाने या योजनेचा शुभारंभ केला. तसेच ही योजना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांसाठी लागू असेल आणि याअंतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घराच्या जवळपासतच रोजगार मिळेल, असे मोदी म्हणाले. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित मजूर बेरोजगार झाले आणि त्यांना आपापल्या गावी जावे लागले आहे. अशातच या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशOdishaओदिशाBJPभाजपा