शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

एक बातमी वाचली अन् मोदींना 'आयडिया' सुचली, दिली तब्बल 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:33 IST

या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची, असं मोदींनी सांगितलं.

ठळक मुद्देया योजनेंतर्गत 25 कामे निवडण्यात आली आहेत. या योजनेतून गावातील प्रत्येक गरज पूर्ण केली जाऊ शकते.देशातील 116 जिल्ह्यांत योजनेची सुरुवातया योजनेंतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घराच्या जवळच रोजगार मिळेल.

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुसऱ्या राज्यांतून परतलेल्या स्थलांतरित मजुरांना, त्यांच्या घराच्या जवळपासच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 50,000 कोटी रुपयांनिशी 'गरीब कल्याण रोजगार अभियानाला'  सुरुवात केली. ही योजना बिहार राज्यातल्या खगडिया जिल्यातील बेलदौर भागातील तेलिहार गावातून सुरू करण्यात आली आहे. स्थलांतरित आणि गावातील मजुरांना सशक्त बनवणे, स्थानिक पातळीवर विकासाला गती देणे आणि उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेमाकचा मुख्य हेतू आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना या अभियानाची कल्पना कशी सुचली, हेही सांगितले. 

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी लॉकडाउनदरम्यान एक बातमी बघितली, ही बातमी उत्तर प्रदेशातल्या उन्नावची होती. तेथे एका शाळेचे रुपांतर क्वारंटाइन सेन्टरमध्ये करण्यात आले होते. येथे शहरांतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. यावेळी अधिकांश मजूर हे दक्षीण भारतातून आले होते. हे मजूर रंग-रंगोटी आणि पीओपीच्या कामात अत्यंत एक्सपर्ट होते. मात्र, क्वारंटाइन होते. आपल्या गावासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. हे मजूर म्हणाले, दोन वेळ खाऊन फक्त बसण्यापेक्षा, आम्हाला जे येते, त्याचा उपयोग करून घ्या, ते काम आमच्याकडून करून घ्या. यानंतर या मजूर भावंडांनी क्वारंटाइनमध्ये असतानाच संपूर्ण शाळेचा कायाकल्प करून टाकला. 

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची. गावातील मजुरांमध्ये एवढा कौशल्य आहे, त्यांचे हेच कौशल्य आणि श्रम गावाच्या कामी आले, तर गावांचा कायाकल्प होईल. यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत 25 कामे निवडण्यात आली आहेत. या योजनेतून गावातील प्रत्येक गरज पूर्ण केली जाऊ शकते.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

देशातील 116 जिल्ह्यांत योजनेची सुरुवात -पंतप्रधानांनी व्हिडिओ कॅन्फरन्सिंगच्या माध्यमाने या योजनेचा शुभारंभ केला. तसेच ही योजना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांसाठी लागू असेल आणि याअंतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घराच्या जवळपासतच रोजगार मिळेल, असे मोदी म्हणाले. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित मजूर बेरोजगार झाले आणि त्यांना आपापल्या गावी जावे लागले आहे. अशातच या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशOdishaओदिशाBJPभाजपा