शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:09 IST

Mizoram CM Lalduhoma : मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

Mizoram CM Lalduhoma : मिझोरम सरकारने कामात टाळाटाळ करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नीट काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

सरकारी कर्मचाऱ्यांची वाढती बेपर्वाई लक्षात घेऊन मिझोरम सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जो कर्मचारी आपले काम नीट करत नाही, त्याला सेवेतून मुक्त केले जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच, किती कर्मचारी आपली जबाबदारी चोख बजावत आहेत? याचा शोध घेण्यासाठी शासन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर सरकारने आढावा घेण्यासाठी समित्या तयार करण्यास सुरुवात केली आहे.

चौकशीसाठी अनेक समित्या स्थापनजे आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतील, असे मंगळवारी आयझॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि निष्क्रिय कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.

अयोग्य कर्मचाऱ्यांना सरकार काढून टाकणारअयोग्य कर्मचारी यापुढे नोकरीसाठी योग्य नाहीत म्हणून त्यांना काढून टाकले पाहिजे. आमचे सरकार उत्तम दर्जाच्या सेवा देणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले. तसेच, सरकार राज्यभरात सर्व प्रकल्पांची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पावले उचलत आहे. राज्य प्रकल्प संनियंत्रण समितीमार्फत सर्व प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. समितीने आतापर्यंत जवळपास 40 प्रकल्पांचा आढावा घेतला आहे, असेही मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारीIndiaभारत