शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:09 IST

Mizoram CM Lalduhoma : मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

Mizoram CM Lalduhoma : मिझोरम सरकारने कामात टाळाटाळ करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नीट काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

सरकारी कर्मचाऱ्यांची वाढती बेपर्वाई लक्षात घेऊन मिझोरम सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जो कर्मचारी आपले काम नीट करत नाही, त्याला सेवेतून मुक्त केले जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच, किती कर्मचारी आपली जबाबदारी चोख बजावत आहेत? याचा शोध घेण्यासाठी शासन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर सरकारने आढावा घेण्यासाठी समित्या तयार करण्यास सुरुवात केली आहे.

चौकशीसाठी अनेक समित्या स्थापनजे आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतील, असे मंगळवारी आयझॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि निष्क्रिय कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.

अयोग्य कर्मचाऱ्यांना सरकार काढून टाकणारअयोग्य कर्मचारी यापुढे नोकरीसाठी योग्य नाहीत म्हणून त्यांना काढून टाकले पाहिजे. आमचे सरकार उत्तम दर्जाच्या सेवा देणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले. तसेच, सरकार राज्यभरात सर्व प्रकल्पांची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पावले उचलत आहे. राज्य प्रकल्प संनियंत्रण समितीमार्फत सर्व प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. समितीने आतापर्यंत जवळपास 40 प्रकल्पांचा आढावा घेतला आहे, असेही मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारीIndiaभारत