शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:09 IST

Mizoram CM Lalduhoma : मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

Mizoram CM Lalduhoma : मिझोरम सरकारने कामात टाळाटाळ करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नीट काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.

सरकारी कर्मचाऱ्यांची वाढती बेपर्वाई लक्षात घेऊन मिझोरम सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जो कर्मचारी आपले काम नीट करत नाही, त्याला सेवेतून मुक्त केले जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच, किती कर्मचारी आपली जबाबदारी चोख बजावत आहेत? याचा शोध घेण्यासाठी शासन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर सरकारने आढावा घेण्यासाठी समित्या तयार करण्यास सुरुवात केली आहे.

चौकशीसाठी अनेक समित्या स्थापनजे आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतील, असे मंगळवारी आयझॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि निष्क्रिय कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.

अयोग्य कर्मचाऱ्यांना सरकार काढून टाकणारअयोग्य कर्मचारी यापुढे नोकरीसाठी योग्य नाहीत म्हणून त्यांना काढून टाकले पाहिजे. आमचे सरकार उत्तम दर्जाच्या सेवा देणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले. तसेच, सरकार राज्यभरात सर्व प्रकल्पांची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पावले उचलत आहे. राज्य प्रकल्प संनियंत्रण समितीमार्फत सर्व प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. समितीने आतापर्यंत जवळपास 40 प्रकल्पांचा आढावा घेतला आहे, असेही मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारीIndiaभारत