शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Mission Shakti: इस्रोने वाढवली देशाची शान; राजकारणाच्या नादात विसरू नका शास्त्रज्ञांचं योगदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 17:29 IST

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यानं, देशानं घेतलेल्या या उत्तुंग भरारीचं राजकारण होणं अपेक्षितच होतं.

ठळक मुद्देनव्या भारतासाठी अशक्य असं काहीच नाही, हे आपण 'ऑपरेशन शक्ती'द्वारे पुन्हा सिद्ध केलं आहे.इस्रो, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे देशाची मान जगात अभिमानानं उंचावली आहे.

आजवर जगातील केवळ तीन देशांना - अमेरिका, रशिया आणि चीनला जमलेला पराक्रम आज भारताने करून दाखवला. 'हम किसी सें कम नहीं' आणि नव्या भारतासाठी अशक्य असं काहीच नाही, हे आपण 'ऑपरेशन शक्ती'द्वारे पुन्हा सिद्ध केलं आहे. क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती भारतानं मिळवली आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचं आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओचं मोलाचं योगदान आहे. या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे देशाची मान जगात अभिमानानं उंचावली आहे. त्यासाठी त्यांना सलाम करणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्य आहे. 

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यानं, देशानं घेतलेल्या या उत्तुंग भरारीचं राजकारण होणं अपेक्षितच होतं. त्यानुसार ते सुरूही झालंय. इस्रो आणि डीआरडीओची स्थापना काँग्रेसनंच केली होती इथपासून, ते २०१२ मध्येच 'मिशन शक्ती'ची सुरुवात झाली होती, इथपर्यंत बरंच काही लिहिलं-बोललं जातंय. परंतु, या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या धबडग्यात इस्रो, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची मेहनत आपण विसरता कामा नये. 

आजचं युग हे 4G चं आहे आणि ते हळूहळू 5G, 6G, 7G चं होत जाणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अवकाशाची - म्हणजेच 'स्पेस'ची 'स्पेस' अनन्यसाधारण आहे. शेती, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, आपत्कालीन व्यवस्थापन, दूरसंचार, टीव्ही, हवामानाचा अंदाज या सगळ्या क्षेत्रांत घडत असलेली क्रांती अंतराळातून मिळणाऱ्या मदतीशिवाय शक्यच नाही. थोडक्यात, प्रगतीचा-विकासाचा मार्ग अंतराळातून जातो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा काळात, इस्रोचे शास्त्रज्ञ जे काही नवनवं संशोधन करताहेत, एकापेक्षा एक भारी उपग्रह अवकाशात सोडत आहेत, त्याला तोड नाही. कमीत कमी खर्चात उपग्रह बनवणं, एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठवणं, फक्त आपलेच नाही, तर इतर देशांचे उपग्रह घेऊन जाणं, मंगळापर्यंत मारलेली मजल ही कामगिरी थक्क करणारी आहे. 

अशातच, इस्रो-डीआरडीओने 'मिशन शक्ती' फत्ते केल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या 'शक्ती'मुळे भारताची अवकाशातील ताकदही प्रचंड वाढली आहे आणि आपण महाशक्ती राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसलोय.

रोजच्या जगण्यातील अवकाशाचं वाढतं प्रस्थ पाहता, पुढची युद्धं ही अवकाशातून लढवली जातील, असं बोललं जातं. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकमध्येही उपग्रहांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. उपग्रहांकडून सगळी माहिती अगदी अचूक आल्यानं नेमकं लक्ष्य भेदता आलं होतं. आता 'मिशन शक्ती'मुळे आपण आपल्याला त्रासदायक ठरणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने नष्ट करू शकणार आहोत. भारताने स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रानं (A-SAT) आज पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. लो अर्थ ऑरबिटमध्ये ही मोहीम यशस्वी करणं आव्हानात्मक होतं. उपग्रहाचा अचूक वेध घेता आला नसता, तर तो पृथ्वीवरही पडू शकत होता. त्यामुळेच चीननंही ही जोखीम पत्करली नव्हती. पण भारतानं हे आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीही केलं. तसंच, लो अर्थ ऑरबिटमध्येच हा लक्ष्यभेद केल्यानं कचराही अवकाशात फिरत राहिला नाही. त्यातून आपल्या शास्त्रज्ञांची कुशाग्र बुद्धिमत्ताच दिसते. त्यामुळे राजकीय नेत्यांना जो गोंधळ घालायचा तो घालू दे, आपण अभिमानानं म्हणू या 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान!'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी साधलेला संवादः

टॅग्स :isroइस्रोMission Shaktiमिशन शक्तीscienceविज्ञानDRDOडीआरडीओNarendra Modiनरेंद्र मोदी