शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 20:30 IST

Congress BJP poster war: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक प्रश्न विचारून परराष्ट्र सचिवांना घेरले. त्यानंतर भाजपने राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही उत्तर दिले. यावरून दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाला. ऑपरेशन सिंदूरबद्दल लष्कर आणि सरकारने माहिती दिली. त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित करत परराष्ट्र सचिवांना घेरले. राहुल गांधींनी एस.जयशंकर यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपने त्यांची तुलना थेट मीर जाफरशी केली आणि हे पोस्टर वॉर वाढलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरवरून भाजप आणि काँग्रेसमध्येमध्ये सोशल मीडियावर राजकीय युद्ध छेडले गेले आहे. दोन्ही पक्ष आणि पक्षाचे नेते एकमेकांवर पोस्टरच्या माध्यमातून हल्ले करताना दिसत आहे. 

अमित मालवीय यांची राहुल गांधींवर टीका

अमित मालवीय यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरसोबत राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला आणि म्हटले की, हे आश्चर्यकारक नाहीये का की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदनही केलं नाही. उलट ते वारंवार हे विचारत आहेत की, किती लढाऊ विमाने गमावली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत आधीच दिले गेले आहे"

त्यानंतर अमित मालवीय यांनी आणखी एक फोटो शेअर केला. ज्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधींची तुलना मीर जाफर याच्याशी केली. 'राहुल गांधी हे आधुनिक काळातील मीर जाफर आहेत', असे ते म्हणाले. 

काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा फोटो पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत जोडल्याने काँग्रेसनेही तशाच पद्धतीने उत्तर दिल्याचे दिसले. बिहार काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो शेअर केला. 

यात अर्धा चेहरा मोदींचा आहे, तर अर्धा चेहरा शरीफ यांचा आहे. हा फोटो शेअर करताना काँग्रेसने म्हटले आहे की, 'एक बिर्याणी देशावर भारी ठरली.'

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची तुलना जयचंदशी केली. त्यांनी एक कार्टून शेअर केले आहे, ज्यात एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदींना दाखवण्यात आले आहे. 'जयशंकर आधुनिक काळातील जयचंद आहेत का?', असा खोचक सवाल त्यांनी भाजपला केला. 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही अमित मालवीय यांच्यावर पलटवार केला. खेरा म्हणाले, "पाकिस्तानची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत, याबद्दल लष्कराने माहिती दिली आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आमचा विश्वास नाहीये, तो भारताच्या राजकीय नेतृत्वावर. त्यांना उत्तर द्यावं लागेल की, ऑपरेशन सिंदूर कुणाच्या दबावामुळे अचानक थांबवण्यात आले?"

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी