शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 2:32 PM

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत राजीनामे

भोपाळ: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यावरुन भाजपामधील अंतर्गत कलह समोर आले आहेत. सध्या देशभरात सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनं सुरू असताना भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या ४८ सदस्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादं सरकार संसदेत कायदा मंजूर करुन घेत आणि मग घरोघरी जाऊन कायद्यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतं, असं तुम्ही कधी पाहिलंय का?, असा सवाल आदिल खान यांनी उपस्थित केला. खान यांनी नुकताच भोपाळ जिल्ह्याच्या अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातले अनेक कार्यकर्ते मुस्लिम समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधानं करत असल्याचा आरोपदेखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्यांपैकी अनेकांनी केला. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देताना ४८ जणांनी राज्य भाजपाच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षांनादेखील पत्र लिहिलं. एकेकाळी शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजेपयींच्या तत्त्वांनी चालणारा, भेदभाव न करणारा पक्ष आता पूर्णपणे बदलला आहे. पक्षात लोकशाही राहिलेली नाही. संपूर्ण पक्षावर दोन किंवा तीन नेत्यांचंच वर्चस्व आहे, अशा शब्दांत राजीनामा देताना सदस्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्यांच्या आरोपांवर भाष्य करण्यास भाजपा नेत्यांनी नकार दिला. काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपानं केला. देशहिताविरोधात काम करणाऱ्या नेत्यांनी आणि कम्युनिस्टांनी आमच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल केली. आमच्या कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देण्यात आली, असा आरोप भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी केला.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा