शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 21:53 IST

आत्मनिर्भर भारत पॅकेजमधील घोषणांवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं भाष्य

नवी दिल्ली: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात २० लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केलं. मात्र हे पॅकेज अपुरं असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. सरकारनं प्रवासी मजुरांना मोफत डाळ आणि धान्य देण्याची घोषणा केली आहे. पण दूध, भाजी, तेल आणि घरभाड्यासाठी मजुरांना पैशांची गरज असल्याचं राजन म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी कोरोनाचं संकट, त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि मोदी सरकारनं जाहीर केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज यावर भाष्य केलं. 'कोरोना संकट येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीत होती. विकास दरात सातत्यानं घसरण सुरू होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. २० लाख कोटींच्या पॅकेजमधून काही चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र सध्याच्या घडीला त्यापेक्षा बरंच काही करणं गरजेचं आहे,' असं राजन म्हणाले.  देशाच्या अर्थव्यवस्थेला काही ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. काही बँका, मोठ्या कंपन्या, लघु सूक्ष्म मध्यम क्षेत्रांमध्ये (एमएसएमई) बदलांची गरज आहे. मोदींनी केलेल्या घोषणांमुळे काही क्षेत्रांमध्ये आवश्यक दुरुस्ती होईल. मात्र काही क्षेत्रांमध्ये पूर्णपणे धोरणात्मक बदल गरजेचे आहेत, असं राजन यांनी म्हटलं.आत्मनिर्भर पॅकेजमध्ये अर्थव्यवस्थेशी संबंधित फारशा मोठ्या घोषणा नाहीत. प्रवासी मजुरांसाठी केलेल्या तरतुदीदेखील अपुऱ्या आहेत. त्यांना मोफत धान्य आणि डाळ दिली जाणार आहे. मात्र यासोबतच त्यांच्या हाती पैसा जायला हवा होता. मात्र तशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असं मत राजन यांनी व्यक्त केलं. ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणारपुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaghuram Rajanरघुराम राजनNarendra Modiनरेंद्र मोदी