शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:33 IST

Maharashtra News : भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रत्येक वर्षी पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारश करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र लोकसभेत केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण आलं आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, भारतरत्न देण्यासाठी शिफारश येत राहतात. मात्र त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशींची गरज भासत नाही. भारतरत्नबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. 

भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते. यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीवेळीभाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपापासून वेगळी झाली त्यामुळे भाजपाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकलं नाही. 

हिंदुत्ववादी विचारधारेचे वीर सावरकर हे हिंदू महासभेशी जोडलेले होते. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदुत्व विचारधारेशी जोडलेले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सावरकरांना आपला आदर्श मानतात. सावरकरांचे पणतु रणजीत सावरकर यांनी असंही सांगितलं होतं की, इंदिरा गांधी सावरकर समर्थक होत्या. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला गुडघ्यावर टेकायला भाग पाडलं. लष्कर आणि परराष्ट्र धोरण मजबूत केलं असा दावा त्यांनी केला होता. 

मात्र भाजपाने जाहीरनाम्यात वीर सावरकरांसाठी ‘भारतरत्न’साठी शिफारस करू असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात द्यायचे? हे बरोबर नाही. सावरकर हे जगभरातील क्रांतिकारकांचे ‘नायक’ होते. ते तसेच राहतील. त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही देशाची इच्छा आहे. तो देशाचा बहुमान ठरेल अशा शब्दात शिवसेनेने भाजपाच्या जाहिरनाम्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करू त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला होता. 

तसेच काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ''काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी नाही. सावरकरांबाबत आम्हाला आदरच आहे. स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.'' असे मनमोहन सिंह यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार