शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:33 IST

Maharashtra News : भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रत्येक वर्षी पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारश करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र लोकसभेत केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण आलं आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, भारतरत्न देण्यासाठी शिफारश येत राहतात. मात्र त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशींची गरज भासत नाही. भारतरत्नबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. 

भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते. यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीवेळीभाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपापासून वेगळी झाली त्यामुळे भाजपाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकलं नाही. 

हिंदुत्ववादी विचारधारेचे वीर सावरकर हे हिंदू महासभेशी जोडलेले होते. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदुत्व विचारधारेशी जोडलेले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सावरकरांना आपला आदर्श मानतात. सावरकरांचे पणतु रणजीत सावरकर यांनी असंही सांगितलं होतं की, इंदिरा गांधी सावरकर समर्थक होत्या. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला गुडघ्यावर टेकायला भाग पाडलं. लष्कर आणि परराष्ट्र धोरण मजबूत केलं असा दावा त्यांनी केला होता. 

मात्र भाजपाने जाहीरनाम्यात वीर सावरकरांसाठी ‘भारतरत्न’साठी शिफारस करू असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात द्यायचे? हे बरोबर नाही. सावरकर हे जगभरातील क्रांतिकारकांचे ‘नायक’ होते. ते तसेच राहतील. त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही देशाची इच्छा आहे. तो देशाचा बहुमान ठरेल अशा शब्दात शिवसेनेने भाजपाच्या जाहिरनाम्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करू त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला होता. 

तसेच काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ''काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी नाही. सावरकरांबाबत आम्हाला आदरच आहे. स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.'' असे मनमोहन सिंह यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार