शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:33 IST

Maharashtra News : भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रत्येक वर्षी पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारश करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र लोकसभेत केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण आलं आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, भारतरत्न देण्यासाठी शिफारश येत राहतात. मात्र त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशींची गरज भासत नाही. भारतरत्नबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. 

भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते. यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीवेळीभाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपापासून वेगळी झाली त्यामुळे भाजपाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकलं नाही. 

हिंदुत्ववादी विचारधारेचे वीर सावरकर हे हिंदू महासभेशी जोडलेले होते. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदुत्व विचारधारेशी जोडलेले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सावरकरांना आपला आदर्श मानतात. सावरकरांचे पणतु रणजीत सावरकर यांनी असंही सांगितलं होतं की, इंदिरा गांधी सावरकर समर्थक होत्या. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला गुडघ्यावर टेकायला भाग पाडलं. लष्कर आणि परराष्ट्र धोरण मजबूत केलं असा दावा त्यांनी केला होता. 

मात्र भाजपाने जाहीरनाम्यात वीर सावरकरांसाठी ‘भारतरत्न’साठी शिफारस करू असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात द्यायचे? हे बरोबर नाही. सावरकर हे जगभरातील क्रांतिकारकांचे ‘नायक’ होते. ते तसेच राहतील. त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही देशाची इच्छा आहे. तो देशाचा बहुमान ठरेल अशा शब्दात शिवसेनेने भाजपाच्या जाहिरनाम्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करू त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला होता. 

तसेच काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ''काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी नाही. सावरकरांबाबत आम्हाला आदरच आहे. स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.'' असे मनमोहन सिंह यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार