शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

#MeToo : एम. जे. अकबर यांचे मंत्रिपद आले धोक्यात!; सात महिला पत्रकारांनी केल्या लैंगिक छळाच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 6:07 AM

अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे. त्यामुळे अकबर आता स्वत:हून राजीनामा देतात की त्यांना डच्चू दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. याआधी बलात्काराच्या आरोपावरून निहालचंद मेघवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.अकबर सध्या नायजेरियात असून, ते गुरुवारी रात्री वा शुक्रवारी दिल्लीत परततील. त्यांनी या तक्रारींविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपातून दबाव वाढत आहे. याआधी मनेका गांधी यांनी या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही तीच मागणी केली. अर्थात अकबर यांनीच त्यावर बोलणे उचित ठरेल, असे त्या म्हणाल्या. महिलांना अशा विषयांवर बोलणेच अवघड असते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, नियमित पगारासाठी आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्या नोकरी करतात. त्यामुळे अशा महिलांना पाठिंबा व न्याय मिळणे आवश्यकच आहे, असे इराणी म्हणाल्या.निहालचंद मेघवाल यांच्यावर बलात्काराचा आरोप होताच, त्यांना डच्चू देण्यात आला होता. भाजपा नेत्यांच्या दृष्टीने एम. जे. अकबर हे तर बाहेरून पक्षात आले आहेत. मुस्लीम समाजही त्यांना आपले मानत नाही. केंद्र सरकारला पश्चिम आशियाई देशात मदत व्हावी यासाठी अकबर यांना मंत्री केले. पण त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर येत असताना, त्यांचे पदच धोक्यात आले आहे.अर्थात मंत्रिपदावरून काढण्यापूर्वी अकबर यांना त्यांची बाजू मांडण्याची नक्कीच संधी दिली जाईल, असे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. अकबर यांच्याविरोधात ज्या पद्धतीने तक्रारी येत आहेत, ते पाहता, त्यांना सरकारमध्ये ठेवणे योग्य नाही, असे रा. स्व. संघाचेही मत असल्याचे समजते.या आहेत सात जणीएम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे.पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे.- मनेका गांधी, केंद्रीय मंत्री

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo Campaignमीटू